नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अजमेरी नगर भागात रस्त्याने पायी जाणा-या तरूणास दुचाकीवरील तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याने युवक जखमी झाला असून याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल शिरसाठ (रा.सिन्नरफाटा) निखील शिरसाठ (रा.गायकवाडमळा,गोरेवाडी) व आकाश उबाळे (रा.अरिंगळे मळा,एकलहरारोड) अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी राजाराम नेपाळी मिश्रा (रा.एक्स्लो पॉईंट झोपडपट्टी,शिवाजीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मिश्रा मंगळवारी (दि.१५) रात्री औद्योगीक वसाहतीतून रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. अजमेरी नगर येथील केवल पार्क भागातून ते पायी जात असतांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयित त्रिकुटाने रस्त्याच्या कडेने नाही चालता येते का ? असा जाब विचारत त्यांना शिवीगाळ केली. यावेळी मिश्रा यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्रिकुटाने त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या हाणामारीत संशयितांपैकी एकाने मिश्रा यांच्या पोटावर धारदार शस्त्राने वार केल्याने ते जखमी झाले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.