नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चार जनावरे पळवून नेल्याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रघूनाथ त्र्यंबक कड (४३ रा.लहवित,दे.कॅम्प) यांनी तक्रार दाखल केली आहे. गोट्या उर्फ निलेश ज्ञानेश्वर काळे (रा.नाणेगाव ता.जि.नाशिक) व बालत्या उर्फ आकाश वाघ (३५ रा.सुनिल वाडेकर यांच्या मळय़ात बॉर्न्स स्कूल) अशी जनावरे पळविणा-या संशयितांची नावे आहेत. जनावरे चारून घराकडे परतत असतांना दोन गुराख्यांनी तीन म्हशी व एक पारडू चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. लष्करी जंगलात घडलेल्या या घटनेत सर्व गुराख्याची जनावरे एकत्र झाल्याने अंधाराचा फायदा घेत संशयितांनी लष्करी हद्दीतील मोकळया जंगलात परिसरातील नागरीक आपली जनावरे चारण्यासाठी घेवून जातात. लहवित येथील रघूनाथ कड १५ सप्टेंबर रोजी आपली जनावरे घेवून नेहमीप्रमाणे या जंगलात गेले होते. त्यात ९ म्हशी, ६ गायी,तीन पारडे व एका हेल्याचा समावेश होता. या ठिकाणी कड यांच्यासह परिसरातील वेगवेगळया गावातील गुरे चारण्यासाठी आलेले होते. दिवसभर गुरे चारून सायंकाळी सर्व गुराखी आपआपली जनावरे घेवून घराकडे परतत असतांना संशयितांनी अंधाराचा फायदा उचलत कड यांच्या तीन म्हशी व एक पारडू आपल्या जनावरांमध्ये एकत्र करून पळवून नेले. अधिक तपास हवालदार जगदाळे करीत आहेत.