नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील वेगवेगळया भागात शुक्रवारी तीन आत्महत्याच्या घटना घडल्या आहे. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पहिली घटना चुंचाळे शिवारात घडली. संदिप भागाजी डाकरके (३५ रा.घरकुल योजना चुंचाळे शिवार) यांनी आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या हुकाला पडद्याच्या सहाय्याने गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत पोलिस शिपाई गवळी यांनी खबर दिली आहे. तर दुसरी घटना सिडकोत घडली. येथे राहणा-या अश्विनी रमेश खैरनार (४१ रा.दत्तमंदिरासमोर,शिवशक्तीचौक त्रिमुर्ती चौक) या महिलेने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये छताच्या हुकाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पती रमेश खैरनार यांनी खबर दिली आहे. दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार परदेशी व चव्हाण करीत आहेत. तर जेलरोड भागातील त्र्यंबक काशिनाथ गुरव (५३ रा. इंगळेनगर कॅनोल रोड) यांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटुंबियंनी त्यांना तात्काळ जिल्हानरूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार शेजवळ करीत आहेत.