नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव येथे पोलिसात तक्रार केल्याच्या कारणातून चार जणांच्या टोळक्याने कुटूंबियास मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी लक्ष्मीबाई काळू बलसाने (रा.मातंगवाडा,आडगाव) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित विश्वास लभडे,चेतन धनाजी जगताप,युवराज चंद्रकांत शिरसाठ व कार्तिक विश्वास लभडे अशी कुटूंबियास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. बलसाने कुटुंबिय शनिवारी (दि.३१) रात्री आपल्या घरात असतांना संशयित टोळक्याने घरासमोर येवून शिवीगाळ केली. पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीची कुरापत काढून टोळक्याने तुम्ही माजले का येथे कसे राहतात अशी दमबाजी करीत महिलेसह पती व मुलांना लाकडी दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.