यवतमाळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईहून यवतमाळला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचा नाशिक शहरामध्ये भीषण अपघात झाला. बस पेटल्याने तब्बल ११ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ३८ प्रवासी जखमी आहेत. या दुर्घटनेची गंभीर दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे. त्यामुळेच ते चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयात पोहचले. ट्रॅव्हल्सच्या संचालकाकडून त्यांनी प्रवाशांबद्दलची आणि दुर्घटनेची माहिती घेतली. आग कशामुळे लागली, बसमध्ये पुरेशी सुरक्षा यंत्रणा होती का, याची माहिती त्यांनी घेतली. तसेच, राठोड यांनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधला. सर्व जखमींवर योग्य उपचार सुरू आहेत का याची खातरजमा त्यांनी केली. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते का, याची चौकशी करण्याचे निर्देश राठोड यांनी दिले आहेत.
Nashik Bus Fire Accident Yavatmal Guardian Minister Visit