नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदूरनाका येथे खासगी बसच्या भीषण अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर ४१ प्रवासी जखमी झाले आहेत. या बसमध्ये एकूण ५३ प्रवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बसची प्रवासी क्षमता ३० असतांना प्रत्यक्षात ५३ प्रवाशांची वाहतूक करण्यात येत होती. याचाच अर्थ बसमध्ये २३ प्रवाशी अतिरिक्त असल्याचे उघडकीस आले आहे. खासगी प्रवासी वाहतुकीवर सरकारचे कुठलेही नियंत्रण नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. त्यातून हे स्पष्ट झाले आहे की, सरकारी नियमांचे उल्लंघन करीत प्रवासी वाहतूक होत आहे. आता या प्रकरणी चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या संचालकांवर काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Nashik Bus Fire Accident Capacity Passengers Rule Violation