नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित दादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून आ. देवयानी फरांदे व भाजपा कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज शहरात रविवार कारंजा येथे अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप आमदार देवयानी फरांदे म्हणाल्या की, हिंदवी स्वराज्य टिकवण्यात व वाढविण्यात छत्रपती संभाजी महाराज यांचे योगदान फार मोठे आहे. हिंदू धर्मासठी १४ दिवस अन्नवित अत्याचार व अवहेलना सहन केली. कोणताही आवाज न करता मृत्यूला कवटाळले त्या संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणायचे नाही तर कोणाला म्हणायचे असा सवाल उपस्थित केला.
तसेच पवार परिवाराच्या हिंदुत्वावरील रागामुळे व राष्रवादी काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या भूमिकेमुळेच अजित पवार छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर मानण्यास तयार नाहीत. असा आरोप केला. अजित पवार याचे वक्तव्य हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान आहे. धर्मवीर संभाजी महाराजांचा हा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नसून अजितदादांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी फरांदे यांनी केली आहे. यावेळी आ. देवयानी फरांदे यांच्यासह बाळासाहेब सानप, गिरीष पालवे, विजय साने, तुषार भोसले, प्रशांत जाधव, पवन भगूरकर, सुनिल केदार, जगन आण्णा पाटील स्वाती भामरे, होमगौरी अडके, सुनिल देसाई,आमोल गांगुर्डे हरिभाऊ लोणारी, प्रतीक शुक्ल, शाम बडोदे,वसंत उशीर आदी उपस्थितीत होते.