सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयातील नांदगाव तालूक्यातील मध्यम प्रकल्प असलेला नागा-सक्या मध्यम प्रकल्प धरण १०० टक्के भरुन वाहू लागल्याने या परिसरातील शेतकरी आनंदीत झाले आहे. गेल्या दोन-तीन दिवसां पासून होत असलेल्या मुसळधार पावसाने धरण १०० टक्के भरले सध्या धरणाच्या सांडव्यावरुन १७६६ क्युसेस पाण्याचा विसर्ग पांझण नदीत होत आहे. या प्रकल्पातील पाण्यावर नांदगाव तालूक्यातील व चांदवड तालूक्यातील ४२ खेडी पाणी योजनांना पाणी पुरवठा होत असतो. तर परिसरातील शेतक-यांना त्याचा फायदा शेती सिंचना साठी होत असतो.