मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तीन अपत्ये असणारा उमेदवारही निवडणुकीसाठी पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र व्हिलेज पंचायत अॅक्टच्या संदर्भात आज दिला आहे. या निकालामुळे आगामी निवडणुकीसाठी इच्छूक असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे.
याचिकाकर्ता महिला जानेवरी २०२१ च्या निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडून आल्या होत्या. पण, गावातील एका सदस्याने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. त्यानंतर प्रशासनाने महिलेची निवड रद्द केली. तक्रारदाराचे म्हणणे होते की, कट ऑफ डेट ९ सप्टेंबर २००१ होती. महिलेला जो तिसरे मुलं झाले. ते या तारखेनंतर जन्माला आल्याने ती निवडणूक लढविण्यास पात्र नाही.
याचिकाकर्ता महिलेचे वकिल म्हणाले की, तिसऱ्या मुलाचा जन्म १२ फेब्रुवारी २००२ ला झाला होता. परंतु, मॅच्युर नसल्याने २ एप्रिल २००२ ला त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, कट ऑफ डेटनंतर जन्माला आलेले मुल किंवा नॉमिनेशन दाखल करण्यापूर्वी तीन मुलांपैकी एकाचा मृत्यू झाला तर त्या उमेदवारांच्या पात्रतेवर कोणताही परिणाम होणार नाही. असा उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरू शकतो, त्याच्या उमेदवारीवर कोणताही व्यक्ती प्रश्न उपस्थित करू शकत नाही.
काय म्हणाले न्यायालय?
प्रशासनाने एका महिलेला तीन अपत्यांमुळे अपात्र केले होते. त्या महिलेने कट ऑफ डेटनंतर तिसऱ्या मुलाला जन्म दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आर. पेडणेकर यांनी आपल्या निर्णयात म्हटले आहे की, मुल जन्माला आले होते. पण नामांकन भरण्याच्या तारखेपूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे.
Mumbai High Court on Third Child Election Candidature