अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
राज्यातील सत्तांतरच्या उठावात अग्रेसर राहिलेले नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे राजकीय नाट्या नंतर १५ ते २० दिवसानंतर आज मतदार संघात परतले. यावेळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी आमदारांच्या नांदगाव येथील निवासस्थानी स्वागत करण्यासाठी एकच गर्दी केली होती. प्रत्येक नागरिक हा आमदारांचे घेतलेल्या निर्णयाचे स्वागत व अभिनंदन करताना दिसून आला. याप्रसंगी मतदारसंघातील मोठे राजकीय नेते व शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी अनेकांनी भाषणांमध्ये आमदार सुहास अण्णा कांदे यांनी जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाशी आम्ही ठामपणे पाठीमागे उभे असून भविष्यातील वाटचालीस आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू असे मत व्यक्त केले. गेल्या अडीच वर्षात आमदार सुहास अण्णा कांदे यांनी मतदारसंघातील नागरिकांची मन जिंकली आहेत आणि कधी नव्हे तो असा जीवाला जीव देणारा आमदार मतदारसंघाला भेटला आहे म्हणूनच आमदारांच्या निर्णयासोबत आम्ही आहोत आणि सदैव आमदारांसोबत राहू असे मत व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी बोलताना सांगितले की आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही आणि आता आमचे नेते एकनाथजी शिंदे तर मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघाचा विकास करत पुढील वाटचाल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार संघाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे हे ध्येय ठेवून अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. बापूसाहेब कवडे,विष्णू निकम सर, आनंद कासलीवाल ,सुभाष नाना कुठे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, पंकज दादा निकम, अंकुश कातकडे, अनिल तात्या रिंढे,रफिक शेख,गोकुळ कोठारी,डॉ.सुनील तुसे, राजाभाऊ देशमुख,सुधीर देशमुख,बाळासाहेब आव्हाड , विजय इप्पर, राजेंद्र पवार, सरपंच अश्विनी पवार, दीपक सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, सुनील कासलीवाल, संदीप सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, किशोर लहाने, राजेश शिंदे, शिवसैनिक, पदाधिकारी, महीला आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.