जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाईवरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पुराच्या पाण्यामुळे पाणी पुरवठा करणारे पंपच बंद आहेत, त्यामुळे आकाशातून पाणी टाकू का? असे विधान त्यांनी केले आहे. राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्यावर टीका होत आहे.
पाणी टंचाई हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. विशेषतः ग्रामीण भागात पाणीटंचाई संदर्भात नागरिक संवेदनाशील असतात, पाणी टंचाईच्या समस्येवर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी पाणी टंचाईची समस्या मांडणाऱ्या नागरीकांनी त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पावसाळा संपला तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळतच आहे. विशेषतः परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. जळगाव जिल्ह्यातही अनेक ठिकाणी प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्यांना पूर आल्याने पाणी पुरवठा योजनेवर थेट परिणाम झाला, कारण अनेक पाणीपुरवठा योजना या थेट नदीत पात्रातून जोडण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे या संदर्भात एका कार्यक्रमानंतर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांना पाणीपुरवठा खंडित झाल्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की, धरणगाव शहराला पाणी पुरवठा करणारी या मोटारीत गाळ साचल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे नदीत विद्युत पंप तथा मोटर ठेवली असून ती नदीत बुडाल्याने आहे. सध्या दुरुस्त करता येणार नाही. तर, मग आकाशातून पाणी देणार का ? पाणीटंचाईची निर्माण झाली आहे ती तांत्रिक कारणामुळं निर्माण झाली आहे. त्याचे कोणी भांडवल करू नये असे, पाटील यांनी म्हटले आहे. खरे म्हणजे धरणगाव एरंडोल आणि जळगाव परिसरात पावसामुळे पाणीपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांवर दुषित पाणी पिण्याची वेळ आली.
याबाबत पंप दुरुस्त करायला पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, एवढी पाण्याची पातळी वाढली आहे. पंपामध्ये गाळ जमा झाला आहे. पुरामुळे ही तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. हे खरे आहे परंतु नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही त्यामुळे तो प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी वेगळी उपाय योजना करणे शक्य असताना अशाप्रकारे वादग्रस्त विधान करणे म्हणजे नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे असे म्हटले जाते.
वास्तविक पाहता काही दिवसांपूर्वी पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा विभाग सोपविल्यानंतर त्यांनी म्हटले होते की, राज्यात अनेक पाणी पुरवठा योजना आणणार असून खात्यातर्फ चांगल्या योजना राबवल्या जातील असे पाटील यांनी म्हटले होते. मला गुलाब भाऊ नाही तर पाणीवाला बाबा व्हायचे आहे, असे वक्तव्य पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. मात्र आता पाणीवाला बाबत मी काय आकाशातून पाणी टाकू का ? असे वक्तव्य करत असेल तर मग जनतेचे कसे होणार अशी उलटसुलट चर्चा खानदेश मध्ये होत आहे.
Minister Gulabrao Patil Controversial Statement
Water Scarcity