मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील पाटणे गावात मुसळधार पावसाने परसूल धरण भरले असून त्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांसह शेतकर्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो आहे. लहान विद्यार्थी याच पाण्यातून शाळेसाठी ये-जा करतात. पुला अभावी येथे ग्रामस्थांचे हाल होत आहे. त्यातच पाटणे गावात आरोग्य सेवेसाठी जर दाखल व्हायचे असेल तर सात ते आठ किलोमीटरचा फेरा मारून गावात पोहोचावे लागते. परसूल नदीवर फरशी पूल बांधण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांकडून होत आहे.