India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

इकडे लक्ष द्या, पवारांनी प्रत्यक्षात अशी फिरवली भाकरी… भल्या भल्यांना उमगलंच नाही…

India Darpan by India Darpan
May 7, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शरद पवार एखादी कृती करतात आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील राजकारणाला कामी लावतात. २ मे रोजी त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला असला तरीही त्यापूर्वीच भाकरी फिरवण्याचे संकेत देऊन साऱ्यांना कामाला लावले होते. आता त्यांनी राजीनामा मागे घेतला खरा पण भाकरी भवतीच्या राजकारणावरून आता तर्क वितर्क बांधण्यात येत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडणार एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वात भाजपसोबत सत्तेत बसणार आणि अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होणार, अश्या वावड्या गेल्या महिन्याभरापासून उठत आहेत. यात बऱ्याच अंशी तथ्य असल्याचे बोलले जाते. दरम्यान, माध्यमांमध्ये याच बातम्या येत असताना शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी युवा नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे असे म्हणत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे सूतोवाच केले.

पवारांची ही भाकरी चांगलीच गाजली. त्यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावण्यात आले. त्यात एक अर्थ असाही होता की अजित पवारांकडे पक्षाचे नेतृत्व जाणार आणि त्यानंतर राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत बसणार. पण या वाक्याचा खरा अर्थ काय होता, हे पवारांनाच माहिती होते. आणि २ मे रोजी त्यांनी स्वतःच पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे घोषित केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची सगळी गणितेच फिसकटली. कारण त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण राष्ट्रवादीभवतीच फिरू लागले. त्यामुळे हा पवारांचा सुपरशॉट मानला जात आहे.

अशी कारणे असे अर्थ
शरद पवार यांनी राजीनामा देण्यामागची तर अनेक कारणे समजली जात आहेत. पण राजीनामा परत घेण्यामागची कारणेही तेवढीच आहेत. अचानक राजीनामा देऊन पक्षात अस्वस्थता निर्माण करणे आणि आपली पकड सिद्ध करून राजीनामा परत घेणे, हा त्यांचा प्रयत्न होता. तो यशस्वी झाला, असे काहींचे म्हणणे आहे. तर दुसरे म्हणजे सुप्रियाला अध्यक्ष करून पुन्हा अजितच्याच हाती सूत्रे असती आणि पक्षाचे काय झाले असते याचा अंदाजही लावणे कठीण होता, त्यामुळे त्यांनी निर्णय फिरवल्याचे बोलले जात आहे. तर तिसरे म्हणजे आता राजीनामा देणे म्हणजे इतर पक्षांची ताकत वाढविणे आहे, याचा अंदाज आल्यावर त्यांनी राजीनामा मागे घेतला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे.

Maharashtra Politics Sharad Pawar NCP


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

आंब्याचे मार्केटिंग करताना थेट क्यूआर कोडचा वापर; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

आंब्याचे मार्केटिंग करताना थेट क्यूआर कोडचा वापर; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group