India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

ठाकरेंना तर मुख्यमंत्रीपदी राहण्याचा अधिकारच नव्हता? सर्वोच्च न्यायालयात भक्कम दावा

India Darpan by India Darpan
March 1, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या आठवड्यात कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने जोरदार बॅटींग केल्यानंतर आता शिंदे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू आहे. आजच्या सुनावणीत तर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.

ज्या व्यक्तीकडे बहुमत नाही त्याला मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का, असा सवाल त्यांनी युक्तिवाद करताना उपस्थित केला. नीरज कौल यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीचे १३ सदस्य गैरहजर होते. असे कसे शक्य आहे? आपल्याच पक्षातील सदस्यांचा विश्वास नसेल तर काय अर्थ आहे. अपात्रतेच्या प्रकरणातील ४२ सदस्य वगळले तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे बहुमत नव्हते. अशावेळी त्यांना बहुमत नसताना मुख्यमंत्रीपदी राहण्याचा नैतिक अधिकार तरी उरतो का?’ आज त्यांनी शिंदे गटाच्या बैठकीत मंजूर झालेल्या ठरावाची प्रत वाचून दाखवली. उद्या अर्थात गुरुवारी सकाळी पहिला एक तास नीरज कौल युक्तिवाद करणार आहेत. त्यानंतर महेश जेठमलानी आणि मनिंदर सिंग युक्तिवाद करतील. मध्यंतरापूर्वी सॉलिसीटर जनरल हरीश साळवे यांचा युक्तिवाद होईल. तर मध्यंतरानंतर कपिल सिब्बल रिजॉईंडर सादर करणार आहेत. एकूणच सर्वोच्च न्यायायालयाचा सलग दुसरा आठवडा जोरदार युक्तिवादाने रंगणार आहे.

न्यायालयाचा सवाल
बहुसंख्य सदस्यांनी नेमलेल्या प्रतोदचा व्हीप सदस्यांनी पाळायला हवा होता. मग तो का पाळला गेला नाही, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने कौल यांना केला. त्यावर बहुमत आणि व्हीप बघून अध्यक्षांनी निर्णय घ्यायचा असतो, असे कौल म्हणाले.

म्हणून शिंदेंना संधी
अध्यक्षांनी त्या ३९ आमदारांवर कारवाई केली असती तर महाविकास आघाडीचे सरकारच अस्तित्वात राहिले नसते. पण तसे झाले असते तर चित्र वेगळे असते. विधानसभा अध्यक्ष एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवू शकले नाही, त्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली आणि त्यांचा शपथविधी होऊ शकला, हा दावा एका अर्थाने बरोबर आहे, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले.

Maharashtra Political Crisis Supreme Court Shinde Group


Previous Post

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – २ मार्च २०२३

Next Post

या व्यक्तींना आज मिळेल सुखप्राप्ती; जाणून घ्या, गुरुवार, २ मार्च २०२३चे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आज मिळेल सुखप्राप्ती; जाणून घ्या, गुरुवार, २ मार्च २०२३चे राशिभविष्य

ताज्या बातम्या

प्रातिनिधिक फोटो

४५ वर्षाची मामी आणि २४ वर्षाचा भाचा.. दोघांचे प्रेमसंबंध… त्यानंतर असं घडलं की पोलिसही झाले अवाक…

April 2, 2023

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group