गुरूवार, मे 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट? उन्हाळाही कडक जाणार? काय आहे इशारा

by India Darpan
मार्च 12, 2023 | 5:21 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Drought

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही वर्षांत वातावरणात प्रचंड बदल झाले आहेत. कधी कुठला ऋतू सुरू होईल याचा काही भरवसा राहिलेला नाही. ग्लोबल वॉर्मिंगचे दुष्परिणाम सर्वत्र दिसत असताना विविध नैसर्गिक आपत्तींमुळे मानवी जीवन असह्य झाले आहे. अशातच आता एल निनोमुळे राज्यावर दुष्काळाचे संकट असल्याचा इशारा नॅशनल ओशनिक अॅण्ड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशन या हवामानाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेने दिला आहे.

सध्या अवकाळी पावसाने राज्यातील बहुतांश भागाला झोडपले आहे. शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजत आहे. अशातच आता ऐन उन्हाळ्यात दुष्काळाची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापतं. यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढते. त्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळं हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळे भारतात पाऊसमान कमी होते.

एल निनोचा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. एल निनोमुळे मान्सूनच नाही तर हिवाळा देखील उबदार होतो. तसेच उन्हाळा देखील आणखी गरम होतो. एका अहवालानुसार भारताने २००२, २००४, २००९ आणि २०१२ या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले ते एल निनोमुळेच आले. त्यामुळे पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारने उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे.

राज्य सरकार नियोजनाच्या तयारीत
जर यावर्षी कमी पाऊस पडला तर काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात मुख्य सचिवांना बैठक घ्यायला सांगितली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधीमंडळात बोलताना दिली. त्यामुळे येणाऱ्या परिस्थितील तोंड देण्यासाठी राज्य सरकार तयारीत असल्याचे चित्र आहे.

Maharashtra Drought Summer Heat Wave Forecast Climate Weather

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

इंडिया दर्पणची नवी भेट… स्वयंपाकघरातील वनस्पतींची महती उलगडणारी विशेष लेखमाला लवकरच…

Next Post

टाटा देणार कमाईची संधी! तब्बल १९ वर्षांनंतर आला हा योग… आता घेऊनच टाका…

Next Post
Ratan Tata

टाटा देणार कमाईची संधी! तब्बल १९ वर्षांनंतर आला हा योग... आता घेऊनच टाका...

ताज्या बातम्या

image001BXCD

केंद्रीय मंत्री गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन…ही आहे वैशिष्ट्ये

मे 22, 2025
financeHAQQ

मुंबई विमानतळावर ९० हजार अमेरिकन डॉलर्स रोकड‌ आणि सुमारे २२ लाख रुपयांचे सोने जप्त

मे 22, 2025
499781781 1138516098320748 6199252395145758472 n

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची विशाल भरारी; देशपातळीवरील ई-गर्व्हनन्स सुवर्ण पुरस्कार जाहीर

मे 22, 2025
rain1

राज्यात या जिल्ह्यात पुढील ३ दिवस मध्यम जोरदार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

मे 22, 2025
modi 111

महाराष्ट्रातील या १५ अमृत भारत स्टेशनांचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन…

मे 22, 2025
mahavitarn

सायबर भामट्यांनी महावितरणची केली बनावट वेबसाईट…महावितरणने केली ही तक्रार

मे 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011