India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मंत्रिमंडळ विस्तार नसल्याने असा होतोय राज्याच्या कारभारावर परिणाम

India Darpan by India Darpan
March 2, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नऊ महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काही झालेला नाही. एका-एका मंत्र्याकडे अनेक खाती देण्यात आली आहेत. यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्र्यांना दोन्ही सभागृहात ये-जा करण्याची कसरत करावी लागत आहे. मुख्य म्हणजे ऐनवेळ मंत्रीच उपस्थित राहत नसल्याच्या प्रकारावर विरोधकांनी टीकेची झोड उठवित आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नागपूरात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यावेळी एकाही नवीन मंत्र्याचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपमधील अनेक नेते नाराज आहेत. मंत्रीपदाची माळ गळ्यात पडण्याची अपेक्षा ठेवून त्यांचे कार्य सुरू आहे. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे कानाडोळा करत काम सुरू ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू यांनीदेखील मंत्रिमंडळ विस्तारावरून उघडपणे संताप व्यक्त केला होता. त्यानंतर आता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला उत आला आहे.

काय घडले नेमके?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेत असल्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पहिल्या दोन लक्षवेधी राखून ठेवल्याचे सांगत थेट चौथी लक्षवेधी पुकारली. ही लक्षवेधी सार्वजनिक आरोग्य विभागाची होती. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत सभागृहात अनुपस्थित होते. परिणामत: त्या लक्षवेधीला कुणी उत्तर द्यायचे, असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावर विरोधकांनी आक्षेप नोंदवित मंत्र्यांनी स्वत:च्या विभागाशी संबंधित लक्षवेधीप्रसंगी उपस्थित राहायलाच हवे, अशी आग्रही भूमिका घेतली.

अजित पवारांनीही सुनावले
विद्यमान सरकारमध्ये केवळ कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या हाताशी राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे सरकारला दोन्ही सभागृहात कामकाज जुळवून घ्यावे लागणार आहे. लक्षवेधी आल्यानंतर सगळे मंत्री परस्परांच्या तोंडाकडे बघणे योग्य नाही. पुन्हा अशी वेळ येऊ नये, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला सुनावले.

Maharashtra Cabinet Expansion Government Effect Work


Previous Post

‘बाजीगर’ चित्रपटामध्ये सलमान खानला होती मुख्य अभिनेत्याची ऑफर

Next Post

मनिष सिसोदियांमुळे ‘आप’ अडचणीत येणार? असे आहे गणित

Next Post

मनिष सिसोदियांमुळे ‘आप’ अडचणीत येणार? असे आहे गणित

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group