नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नंदुरबार जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतराचा रस्ता तयार करण्याचे काम २०१७ पासून सुरू आहे. अद्यापही तो पूर्ण झालेला नाही. याप्रकरणी सरकार दरबारी वारंवार पत्रव्यवहार केला. पण, काहीच झाले नाही. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणारे पत्र तीनवेळा दिले. पण, त्याचीही दखल घेतली नाही, असा प्रश्न शहाद्याचे आमदार राजेश पाडवी यांनी उपस्थित केला. त्यानंतर अशाच प्रकारचे प्रश्न आणि तक्रारी माजी मंत्री जयकुमार रावल, यशोमती ठाकूर आणि अन्य आमदारांनी मांडल्या. त्यामुळए सभागृहात अतिशय गंभीर वातावरण तयार झाले. आदिवासी भागातील रस्त्याची दयनीस अवस्था, सरकारी योजना, कंत्राटदारांची मनमानी, कामचुकारांना पाठिशी घालणारे सरकारी अधिकारी या सर्वच बाबी यानिमित्ताने चव्हाट्यावर आल्या.
बघा, विधानसभेच्या आजच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
Maharashtra Assembly Session Live Telecast
Vidhan Bhavan Winter Nagpur