India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मराठी भाषा गौरव दिन; कालिदास नाट्यमंदिरात रंगले निमंत्रितांचे कवी संमेलन

India Darpan by India Darpan
February 27, 2023
in साहित्य व संस्कृती
0

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका व सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाकवि कालिदास नाट्यमंदिरात आज मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने निमंत्रितांचे कवी संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास गंगाधर अहिरे, प्रशांत केंदळे, संदिप जगताप, राजेंद्र उगले, कविता गायधनी, तन्वी अमीत, सुरेश पवार, विशाल टर्ले, गोरख पालवे, विष्णु थोरे, रविंद्र देवरे, देविदास चौधरी, संतोष हुदलीकर, सुभाष सबनीस, राजेंद्र सोमवंशी आदी कवी उपस्थित होते. या कवींनी या संमेलनात रंग भरले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व कवींनी कवी संमेलनात सहभागी होऊन राजकिय, सामाजिक, निसर्ग अशा विविध विषयांवर कविता सादर केल्या. यावेळी सर्व कवींचा मराठी भाषा गौरव दिन निमित्त स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त रमेश काळे, उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, नितिन मुंडावरे, गणेश मिसाळ, राजश्री अहिरराव, यांच्यासह सार्वजनिक वाचनालय, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महसुल, जिल्हा परिषद, महापालिकेतील अधिकारी, नागरीक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवयित्री तन्वी अमित यांनी केले.

मानवी जीवन मुल्यांचा ठाव घेणारी भाषा म्हणजे कविता: ऐश्वर्य पाटेकर
कविता निर्मिती ही कठिण प्रक्रिया आहे. मानवी जीवनातील हरवलेल्या मुल्यांचा ठाव घेण्याचे काम कवितेची भाषा करत असते, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ऐश्वर्य पाटेकर यांनी केले. ते आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित निमंत्रितांचे कवी संमेलन या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते. कवि ऐश्वर्य पाटेकर म्हणाले, बिघडलेल्या समाजव्यवस्थेला सुधारण्याचे काम कवितारुपी शब्द करत असतात. तुकाराम महाराजांनी चारशे वर्षांपुर्वी केलेले लिखाण आजही तळपत्या शस्त्राप्रमाणे समाजाला प्रभावित करणारे आहे. कवि कुसुमाग्रजांनी देखील कवितेकडे अतिशय गांभीर्याने पाहिले आहे. पुरस्कार हे भिंतीवर लावण्यासाठी असतात, परंतु कवितेतला शब्द हा वाचकांच्या काळजाला भिडण्यासाठी तो कवीच्या मनातून उस्फुर्तपणे येत असतो. कविता करतांना त्या कवितेची परंपरा समजून घेणेदेखील आवश्यक आहे. आजच्या काळात मराठी भाषा गौरव दिन हा एका कवीचा जन्मदिवस म्हणून साजरा करतो, हा सर्व कवींचा सन्मान आहे. असे सांगून पाटेकर यांनी भाकर आणि आई ही कविता यावेळी सादर केली.


Previous Post

लासलगावला १० तासापासून सुरू असलेले कांदा प्रश्‍नी आंदोलन पालकमंत्री भुसे यांच्या आश्वासनानंतर मागे

Next Post

मनसे नेते अमित ठाकरे संघटनात्मक बांधणीसाठी दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर

Next Post

मनसे नेते अमित ठाकरे संघटनात्मक बांधणीसाठी दोन दिवसांच्या नाशिक दौ-यावर

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group