इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
गोष्टीचा बोध
गुरुजी शाळेत शिकवित असतात.
त्याचवेळी ते ससा आणि कासव
यांची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगतात.
गुरुजी – … अशा रितीने ससा झोपून राहिल्याने
शर्यत हरला. परंतु कासव सतत चालत
राहून शर्यत जिंकला.
मुलांनो, या गोष्टीतून
काय बोध घेतला पाहिजे?
ठमा (आळस देत) – आपण शर्यत हरलो तरी चालेल,
पण आपल्या जोडीदाराला
जिंकून देण्यासाठी
झोपून रहायला पाहिजे
– हसमुख