इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत असतात. ते महायुतीच्या निर्णयावर जोरदारही टीका करतात. पण, त्यांनी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका विधानाबद्दल त्यांचे कौतुक केले आहे.
आव्हाड म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या मुलाखतीत, पर्यटकांना वाचविण्यासाठी ज्या सय्यद अली हसन या काश्मिरी तरूणाने बलिदान दिले, त्याच्याबद्दल गौरवोद्गार काढले. सय्यद अली हसन याच्या शौर्याबद्दल कौतुकास्पद विधाने केली. तसेच, हा अतिरेक्यांनी केलेला हल्ला होता. यामध्ये हिंदू – मुस्लीम असा काहीच सबंध नव्हता, असे उद्गार त्यांच्या मुखातून निघाले. एकीकडे भाजप द्वेष पसरवित असताना एकनाथ शिंदे यांची ही भूमिका नक्कीच कौतुकास्पद आहे. कधीतरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार करायलाच हवा.