India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांसह काही पोलीस अधिकाऱ्यांची होणार चौकशी; हे आहे प्रकरण

India Darpan by India Darpan
January 20, 2023
in राज्य
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरेगाव-भीमा प्रकरणात अनेकांची चौकशी करून त्यांची साक्ष आतापर्यंत नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणातील राजकीय व प्रशासकीय धागेदोरे अनेक बड्या नेत्यांपर्यंत व अधिकाऱ्यांपर्यंत गेले आहेत. त्यामुळे चौकशीची मालिका सुरूच आहे. त्यात आता विश्वास नांगरे पाटील यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी करून साक्ष नोंदविण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणात नेमकं काय घडलं यासाठी ही चौकशी होणार असून २१ ते २५ जानेवारी या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. यामध्ये वरीष्ठ पोलीस अधिकारी विश्वासन नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार या तिघांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे या तिघांची चौकशी होण्यामागेही कारण आहे. कारण तिघेही या घटनेचे साक्षीदार आहेत. स्वतः विश्वास नांगरे पाटील कोल्हापूर परीक्षेत्राचे महानिरीक्षक होते. तर सुवेझ हक हे पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक होते. आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार हे तपास अधिकारी होते. त्यामुळे त्या दिवशी नेमकं काय घडलं, याबद्दल तिघांचीही साक्ष नोंदविली जाणार आहे. प्रकरणातील आरोपी हर्षाली पोतदार आणि तीन अधिकारी या साऱ्यांच्या चौकशीसाठी २१ ते २५ जानेवारी या कालावधीत वेळ निश्चित करण्यात आला आहे.

आयोगाची नोटीस
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने आरोपी हर्षाली पोतदार, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, डॉ. शिवाजी पवार आणि सुवेझ हक यांना नोटीस बजावून चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी २१ ते २३ जानेवारी तर विश्वास नांगरे पाटील व सुवेझ हक यांची चौकशी २४ व २५ जानेवारीला होणार आहे.

राज्यभर पडसाद
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. १ जानेवारी २०१८ ला घडलेल्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला होता. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक झाली होती आणि त्यात एका तरुणाचा मृत्यूही झाला होता. या घटनेचे पडसाद त्यानंतर राज्यभर उमटले होते.

IPS Vishwas Nangre Patil Police Officers Enquiry
Koregaon Bhima Case


Previous Post

अखेर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकारले ३० लाखांचे ‘ते’ आव्हान; आता श्याम मानव काय करणार?

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

Next Post

महाराष्ट्र शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या २ हजार ५०० कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना जारी

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

January 28, 2023

दरमहा १ हजार रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल ५० लाख रुपये! कोणती आहे ही छप्पर फाडके स्कीम?

January 28, 2023

प्रमाणापेक्षा जास्त टाइट ड्रेस घालणे उर्वशी रौतेलाच्या अंगलट; सोशल मिडियात ट्रोल (व्हिडिओ)

January 28, 2023

येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार हा मोठा बदल; शिक्षण मंत्र्यांची माहिती

January 28, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारतात कोरोनाची नवी लाट येणार का? धोका टळला आहे का? तज्ज्ञ म्हणतात…

January 28, 2023

या कारणास्तव कोर्टाने पतीला दिला घटस्फोट; पत्नीबाबत कोर्ट म्हणाले…

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group