अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्ह्यातील मुंबई- भुसावळ लोहमार्गावरील मनमाड हे महत्वाचे मोठे जंक्शन आहे. त्यामुळे १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर आज रेल्वे सुरक्षा बलातर्फे येणा-या रेल्वे तसेच प्लॅटफॅार्मवरील प्रवाशांचे सामान व रेल्वे पार्सल विभागातील परिसराची तपसाणी श्वान पथकाव्दारे करण्यात आली. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्स साजरा होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाक़डून ही तपासणी करण्यात येत आहे.