मंगळवार, जुलै 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

by Gautam Sancheti
जून 18, 2025 | 6:43 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
image003Y64Y

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड येथे देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गति शक्ती मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन केले.

मारुती सुझुकीच्या मानेसर येथील प्रकल्पातील गति शक्ती कार्गो टर्मिनल हा एक महत्त्वाचा पायाभूत सुविधा विकास प्रकल्प असून, त्यामुळे ऑटोमोबाईल वाहतुकीच्या लॉजिस्टिक्स कार्यक्षमतेत लक्षणीयरित्या वाढ होणार आहे. या गतिशक्ती कार्गो टर्मिनलची लोडिंग क्षमता भारतातील सर्वाधिक क्षमतेपैकी एक, म्हणजेच वार्षिक ४.५ लाख वाहने इतकी आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थितांना संबोधित करताना, गेल्या दशकात भारतीय रेल्वेमध्ये झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांना अधोरेखित केले. ते म्हणाले, २०१४ पूर्वी रेल्वेचा वार्षिक अर्थसंकल्प २४००० ते २५००० कोटी रुपयांच्या जवळपास असायचा. आता त्यात वाढ करून तो २,४ लाख कोटी झाला आहे. अनेक स्थानकांवर आणि डब्यांमध्ये शौचालये यांसारख्या मूलभूत प्रवासी सुविधा उपलब्ध नव्हत्या. गेल्या अडीच वर्षांत, सामान्य श्रेणीच्या डब्यांची संख्या वाढवण्यासाठी एक केंद्रित अभियान सुरू करण्यात आले आहे. केवळ गेल्या एका वर्षात १२०० पेक्षा जास्त सामान्य श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

प्रवासी रेल्वे सेवा अद्ययावत करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता १०० पेक्षा जास्त मेमू गाड्यांची क्षमता वाढवली जाईल — त्यांची रचना ८ ते १२ डब्यांवरून १६ ते २० डब्यांपर्यंत वाढवली जाईल — ज्यामुळे कमी अंतरावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. १०० पेक्षा जास्त मेमू गाड्यांच्या निर्मितीसाठी आंध्र प्रदेशातील काझीपेट येथे एक नवीन कारखाना उभारण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

नमो भारत ट्रेनच्या यशस्वी प्रारंभाचा संदर्भ देत ते म्हणाले, “सध्या कार्यरत असलेल्या दोन नमो भारत ट्रेनना मिळालेल्या जोरदार सार्वजनिक प्रतिसादाने प्रोत्साहित होऊन, आम्ही वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्यासाठी 50 नवीन नमो भारत ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रवासी आणि मालवाहतुकीच्या कामगिरीबाबत बोलताना, “आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय रेल्वेने अंदाजे ७२० कोटी प्रवाशांची आणि १६१७ दशलक्ष टन मालाची वाहतूक केली. या कामगिरीमुळे भारतीय रेल्वेने जागतिक स्तरावर दुसरी सर्वाधिक मालवाहतूक नोंदवली, ज्यामुळे २०२३-२४ हे वर्ष ऐतिहासिक ठरले, असे त्यांनी सांगितले.

प्रवाशांच्या सोयीबद्दल बोलताना, मंत्र्यांनी तात्काळ तिकीट बुकिंगमध्ये एका महत्त्वपूर्ण सुधारणेची घोषणा केली, जी एक जुलै 2025 पासून लागू होईल. ते म्हणाले, “नवीन नियमानुसार, बुकिंग विंडोच्या पहिल्या ३० मिनिटांत, केवळ आधार-प्रमाणीकृत (Aadhaar-authenticated) आणि केवायसी-सत्यापित वापरकर्त्यांनाच तत्काळ तिकीट बुक करण्याची परवानगी असेल. या उपायामुळे वास्तविक प्रवाशांनाच तिकीटे उपलब्ध होतील हे सुनिश्चित करण्यास मदत होईल.”

अमृत भारत ट्रेनच्या सुरुवातीबद्दल बोलताना, मंत्री म्हणाले, “तीन अमृत भारत ट्रेन सध्या कार्यरत आहेत आणि त्यांना जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. येत्या काही दिवसांत, आणखी सहा अमृत भारत ट्रेन सुरू केल्या जातील आणि, आणखी ५० ट्रेनचे उत्पादन सुरू आहे, आणि त्यानंतर आणखी तुकड्या येतील, असे ते म्हणाले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

Next Post

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

ताज्या बातम्या

GvQZks6WwAArk6Q

पुणे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना…काँग्रेसने धरणे आंदोलन करत व्यक्त केला संताप

जुलै 8, 2025
Untitled 21

बनावट जीआरच्या आधारे तब्बल ७ कोटी रुपयांची विविध विकासकामे….नेमकं घडलं काय

जुलै 8, 2025
Untitled 20

मंत्री संजय शिससाट यांच्या अडचणीत वाढ…मुख्यमंत्री फडणवीस यांनी विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी लावली

जुलै 8, 2025
kanda onion

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करा; राज्याच्या मंत्र्यांची केंद्राकडे ठोस मागणी

जुलै 8, 2025
445

अभियांत्रिकी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीबाबत झाला हा मोठा निर्णय…

जुलै 8, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तीने खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, मंगळवार, ८ जुलैचे राशिभविष्य

जुलै 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011