India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अहमदाबाद कसोटीचा निकाल लागण्यापूर्वीच टीम इंडिया WTC फायनलमध्ये; कसं काय?

India Darpan by India Darpan
March 13, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथ्या सामन्याचा निकालही जाहीर झाला नाही आणि टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. आता अनेक चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की अहमदाबाद कसोटीचा निकाल न लागता भारत अंतिम फेरीत कसा पोहोचला? टीम इंडियाची समीकरणं काय होती?

वास्तविक, ऑस्ट्रेलियाविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने जिंकून भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ होता. दरम्यान, इंदूरमध्ये खेळली गेलेली तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियाने जिंकली. इथून समीकरण बदललं. ते असे होते
अहमदाबाद येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील विजयामुळे भारताचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित होईल
अहमदाबाद कसोटीत टीम इंडिया हरली किंवा तो सामना अनिर्णित राहिला, तर अडचणींचा सामना करावा लागेल.
पराभव झाल्यास त्याला श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अशा स्थितीत न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत किमान एका सामन्यात श्रीलंकेचा पराभव करावा, अशी भारताची इच्छा आहे.
इंदूर कसोटीनंतर गुणतालिकेत काय स्थान होते? हे पहायला हवे. इंदूरमधील विजयानंतर ऑस्ट्रेलियाचे गुणतालिकेत ६८.५२ टक्के झाले होते. पराभवानंतर टीम इंडियाला 60.29 टक्के गुण मिळाले होते.

न्यूझीलंडची मदत
एकीकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी कसोटी अहमदाबादमध्ये खेळली जात आहे आणि दुसरीकडे न्यूझीलंडने श्रीलंकेचा रोमहर्षक सामन्यात पराभव केला. त्यांनी भारताचे समीकरण सोपे केले. श्रीलंकेचा पराभव होताच टीम इंडियाचा मार्ग मोकळा झाला. या समीकरणानुसार लंकेचा संघ एक कसोटी गमावल्यानंतर शर्यतीतून बाहेर पडला होता. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत भारत हरला किंवा ड्रॉ झाला तरी फरक पडणार नाही.

श्रीलंकेच्या पुढील विजयाचे काय?
पुढच्या कसोटीत श्रीलंकेच्या विजयाचा समीकरणात काहीही परिणाम होणार नाही. क्राइस्टचर्चमधील पराभवानंतर श्रीलंकेने पुढची कसोटी जिंकली तरी त्याला केवळ 52.78 टक्के गुण असतील. भारताने अहमदाबाद कसोटी गमावली तरीही हे भारताच्या 56.94 टक्क्यांपेक्षा कमी असेल. जर टीम इंडियाने ही टेस्ट ड्रॉ केली तर त्याला 58.80 टक्के गुण मिळतील. ऑस्ट्रेलिया आधीच अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो हरला तरी तो ६४.९१ टक्के गुणांसह अंतिम फेरीत पोहोचेल.

Indian Cricket Team in WTC Final How


Previous Post

केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका; तो आदेश तत्काळ मागे घेण्याचे आदेश

Next Post

लाल वादळ मुंबईकडे… हजारो शेतकऱ्यांचे पायी कूच… भुसेंची शिष्टाई अयशस्वी… विधानभवनाला वेढा पडणार?

Next Post

लाल वादळ मुंबईकडे... हजारो शेतकऱ्यांचे पायी कूच... भुसेंची शिष्टाई अयशस्वी... विधानभवनाला वेढा पडणार?

ताज्या बातम्या

या व्यक्तींवर आज लक्ष्मी प्रसन्न राहील; जाणून घ्या, रविवार, २ एप्रिल २०२३चे राशिभविष्य

April 1, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २ एप्रिल २०२३

April 1, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – पतीचा मोबाईल

April 1, 2023

नाशिकचे रामकुंड आणि गोपिकाबाई यांचा काय संबंध आहे…. असा आहे इतिहास…..

April 1, 2023

हा एक निर्णय घ्या… कांद्याचा प्रश्नच मिटून जाईल… कांदा उत्पादक संघटनेने दिला हा मोठा पर्याय

April 1, 2023

कोरोना अपडेट : देशात गेल्या २४ तासात इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद

April 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group