नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना भारताने एक डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नागपुरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 177 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 400 धावा केल्या आणि 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 91 धावांवर बाद झाला आणि सामना एक डाव आणि 132 धावांनी गमावला.
भारताने ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला. मोहम्मद शमीने स्कॉट बोलंडला बाद करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 91 धावांत गुंडाळला. त्याने बोलंडला विकेट्ससमोर पायचीत केले. दुसऱ्या टोकाला स्टीव्ह स्मिथ २५ धावांवर नाबाद राहिला. या सामन्यातील विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतासाठी रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन हे या सामन्याचे हिरो ठरले. जडेजाने सात विकेट्स घेतल्या आणि 70 धावा केल्या. त्याचवेळी अश्विनने 23 धावा देत आठ विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलियासाठी संपूर्ण सामन्यात एकाही खेळाडूला अर्धशतक झळकावता आले नाही. तथापि, गोलंदाजांमध्ये टॉड मर्फीने पदार्पणाच्याच सामन्यात सात विकेट घेत शानदार सुरुवात केली.
𝗩𝗶𝗰𝘁𝗼𝗿𝘆 𝗶𝗻 𝗡𝗮𝗴𝗽𝘂𝗿! #TeamIndia 🇮🇳 win by an innings & 1️⃣3️⃣2️⃣ runs and take a 1️⃣-0️⃣ lead in the series 👏🏻👏🏻
What a start to the Border-Gavaskar Trophy 2023 👌🏻
Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/jCVDsoJ3i6
— BCCI (@BCCI) February 11, 2023
India Win First Test Match Against Australia