India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सावधान! तुमचे पोस्टात खाते आहे? तातडीने हे करा, अन्यथा खाते होईल बंद

India Darpan by India Darpan
March 5, 2023
in महत्त्वाच्या बातम्या
0
संग्रहित फोटो

संग्रहित फोटो


 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुमचे जर पोस्टामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, तुम्हाला एक काम तातडीने करावे लागणार आहे. अन्यथा तुचे खाते बंद होऊ शकते. तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल क्रमांक जोडलेला आहे की नाही हे तातडीने तपासा. जर नसेल तर येत्या ३१ मार्च पर्यंत तुम्हाला संधी आहे. त्यानंतर खाते बंद होणार आहे.

सद्यस्थितीत पोस्टाकडून विशेष मोहिम राबविली जात आहे. त्याअंतर्गत पोस्ट खात्याशी मोबाईल क्रमांक जोडण्याचे काम सुरू आहे. मात्र, खातेदारांकडून या मोहिमेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा पुरावा म्हणजे मोबाईल लिंक खात्यांची संख्या. मोहीम सुरू होऊन सुमारे दीड महिना उलटून गेला आहे, परंतु बऱ्याच पोस्ट ऑफिसमधील ६० ते ७० टक्के खातेधारकांनी त्यांचे मोबाइल नंबर त्यांच्या खात्यांशी लिंक केलेले नाहीत.

यापैकी बहुतांश खाती अशी आहेत की ग्राहकांना नियमितपणे पोस्ट ऑफिसला जाण्याची गरज नाही. जसे- RD, FD, सुकन्या समृद्धी, EPF, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, ज्येष्ठ नागरिक खाते. या संदर्भात बचत खात्यांची आकडेवारी काही प्रमाणात समाधानकारक आहे. खातेधारकांचे मोबाईल क्रमांक ७० टक्के बचत खात्यांशी जोडले गेले आहेत. म्हणजेच या खात्याच्या ३० टक्के खातेदारांनीही या मोहिमेकडे आतापर्यंत लक्ष दिलेले नाही.

म्हणून गरजेचे 
ग्राहकांच्या अनियमितपणामुळे या खात्यांमध्ये हेराफेरी होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी खात्याशी मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. कारण, खात्यातून पैसे काढले किंवा जमा केले तरी त्याची माहिती खातेदाराला मोबाईलवर मेसेजद्वारे तत्काळ कळविली जाते. पोस्ट विभागाने काही काळापासून आपल्या खातेदारांना एनईएफटी आणि आरटीजीएस सुविधा देण्यास सुरुवात केली आहे. ही सुविधा देण्यासाठी मोबाईल क्रमांकही आवश्यक आहे. NEFT आणि RTGS दरम्यान खातेधारकाच्या मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. अशा परिस्थितीत खातेदारांना मोबाईल क्रमांक नसल्यामुळे या सुविधेचा लाभ घेता येणार नाही.

यासंदर्भात पोस्ट विभागाने सांगितले आहे की, खातेधारक मोबाईल क्रमांक खात्याशी जोडण्याबाबत गंभीर नाहीत. अजूनही ६० ते ७० टक्के खात्यांमध्ये मोबाईल नंबर जोडला गेलेला नाही. ३१ मार्चपर्यंत ज्या खात्यांशी मोबाईल नंबर लिंक नाहीत ते खाते १ एप्रिलपासून बंद केले जातील. त्याची संपूर्ण जबाबदारी खातेदाराची असेल, असा इशारा पोस्ट विभागाने दिला आहे.

India Post Account Do This Immediately otherwise Account Will Be closed


Previous Post

अल्पवयीन मुलीला फूस लावून आणले; नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी तरुणाला असे पकडले जाळ्यात

Next Post

निफाडला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी… पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज….वेळेआधीच कार्यक्रम थांबवला; (व्हिडिओ)

Next Post

निफाडला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी... पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज....वेळेआधीच कार्यक्रम थांबवला; (व्हिडिओ)

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

आज या व्यक्तींनी कुठलाही व्यवहार करु नये; जाणून घ्या, मंगळवार, २१ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 20, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – मंगळवार – २१ मार्च २०२३

March 20, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवक आणि युवती

March 20, 2023

ओले खोबरे खावे की सुके? नारळाच्या पाण्याचे आहेत एवढे सारे फायदे; आहारात नक्की समावेश करा

March 20, 2023

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; गारपिट नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसांत अंतिम करणार – मुख्यमंत्री

March 20, 2023
संग्रहित फोटो

अॅड. गुणरत्न सदावर्तेंच्या ठाण्यातील कार्यालयात चोरी; हे सर्व सामान लंपास

March 20, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group