इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा उत्तीर्ण होणे अनेक युवक-युवतींचे स्वप्न असते. UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला यशस्वी IAS किंवा IPS अधिकाऱ्यापेक्षा कोण चांगला मार्गदर्शक असू शकतो. एका IAS अधिकाऱ्याची यशोगाथा आपण जाणून घेणार आहोत, विशेष म्हणजे तिने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय स्वयंअभ्यासातून परीक्षा उत्तीर्ण केली.
ही कहाणी आहे आयएएस अधिकारी सर्जना यादवची, जिने कोणत्याही कोचिंग UPSC परीक्षेची तयारी केली. तसेच सर्जना यादव 2019 मध्ये नागरी सेवा परीक्षेत भारतभरात 126 क्रमांक मिळवून IAS अधिकारी बनली. सर्जना यादवने तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले होते.
आजच्या युगात बहुतेक UPSC तयारीसाठी इच्छुक कोचिंग क्लासेसवर अवलंबून असतात, या परीक्षेबद्दल सर्जना यादव यांचे मत वेगळे होते.
एका मुलाखतीत सर्जना म्हणाली की, उमेदवाराला कोचिंग घ्यायचे आहे की नाही हे त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे. जर असे वाटत असेल की तुमच्याकडे पुरेसे अभ्यास साहित्य आहे आणि UPSC साठीची तयारी करण्याची अधिक चांगली जिद्द आहे, तर तुम्ही स्वत:च्या अभ्यासावर अवलंबून राहून यश मिळवू शकता. तसेच सर्जना यादव यांच्या मते, तुम्ही शिस्तबद्ध आणि तुमच्या अभ्यासाबाबत प्रामाणिक असाल तर स्वत:चा अभ्यास अधिक चांगला होतो.
सर्जना यादवने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून अभियांत्रिकीचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर सर्जना यादव ट्रायमध्ये संशोधन अधिकारी म्हणून काम करू लागल्या. पूर्णवेळ नोकरीसोबतच सर्जना यूपीएससी परीक्षेची तयारी करत असे. पहिल्या दोन प्रयत्नात अपयश आल्यानंतरही तिने हार न मानता पुन्हा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि यावेळी ती यशस्वी झाली.
या परीक्षेची तयारी करण्यासाठी उमेदवारांनी त्यांच्या क्षमतेनुसार नियोजन बनवावे, असे सर्जना सांगते. तयारी सुरू करण्याबरोबरच अभ्यासाची वेळही ठरवली पाहिजे. विषय नीट वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. एकदा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, शक्य तितकी उजळणी करा आणि शक्य तितक्या उत्तर लिहिण्याचा सराव करा. अपयशाला घाबरण्याची गरज नाही, मेहनत करत राहा, यश नक्की मिळेल.
देशात दरवर्षी केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या (UPSC) सिविल सर्व्हिस परीक्षेत लाखो उमेदवार आपलं नशीब आजमावतात. पण यश जवळपास १ टक्के उमेदवारांना मिळते. यात बहुतांश असे विद्यार्थी असतात की ज्यांनी कोचिंग क्लासेसवर लाखो रुपये खर्च केलेले असतात. तरीही यश काही प्राप्त होत नाही. याचं मुख्य कारण म्हणजे या परीक्षेची तयारी करण्यासाठी योग्य नियोजनाच्या माहितीचा अभाव होय. पण जर तुम्ही वेळापत्रकाच्या बाबतीत काटेकोर असाल आणि अभ्यासाप्रती प्रामाणिक असाल तर स्वत: अभ्यास करणं खूप चांगला पर्याय ठरतो, असं सर्जना यादव म्हणाली.
सर्जना सांगते की या परीक्षेची तयारी करणारे बहुतेक उमेदवार एकतर नोकरी करत आहेत किंवा नुकतेच पदवीधर झाले आहेत. त्यामुळे त्यांना नियमीतपणे वृत्तपत्र खूप महत्वाचे आहे. यासोबतच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटचीही मदत घेऊ शकता, जिथे चालू घडामोडींची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. जर तुम्ही चांगला अभ्यास केलात तर तुमच्या यशाची शक्यता खूप वाढते, असे तिने सांगितले.
IAS Officer Sarjana Yadav Success Story No Coaching Class