मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोणतेही जेवण कितीही चविष्ट आणि रुचकर असले पण त्यात मीठ नसेल तर ? मीठाशिवाय कोणताही पदार्थ अपूर्ण असतो. मीठ आपल्या जेवणाला चवदार तर बनवते, टेस्ट चांगली करण्यासोबत मीठ खूप फायदेशीर ठरते. परंतु जास्त मीठ खाल्ल्याचे आरोग्यावर दुष्परिणाम देखील होतात.
जास्त प्रमाणात साखरेचे सेवन हे मधुमेहासाठी एक प्रमुख धोका घटक म्हणून ओळखले जाते. एवढेच नाही तर साखर किंवा गोड पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा आणि त्याच्याशी संबंधित इतर अनेक आजारांचा धोका वाढतो. केवळ साखरच नाही तर जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेहमी अधिक गोड पदार्थांच्या दुष्परिणामांबद्दल बोलले जाते, तर या उलट जास्त मीठ वापरण्याकडे आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांकडे कमी लक्ष दिले आहे. परंतु अभ्यास दर्शवितो की, ते साखरेइतकेच हानिकारक असू शकते.
मीठ सुमारे 40 टक्के सोडियम आणि 60 टक्के क्लोराईडने बनलेले आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी हे आवश्यक मानले जाते. स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासाठी हे एक आवश्यक खनिज आहे. जरी डॉक्टरांनी ते मर्यादित प्रमाणात वापरण्याची शिफारस केली आहे. मीठ किंवा खारट पदार्थांचे जास्त सेवन केल्याने शरीरावर अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे अनेक प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक जास्त मीठ खातात त्यांना अकाली मृत्यूचा धोका वाढतो.
मिठाच्या अतिसेवनाचे धोके जाणून घेण्याआधी हे जाणून घेणे आवश्यक आहे की मीठाचे सेवन किती सुरक्षित मानले जाते? आहारविषयक मार्गदर्शक तत्त्वांमधील तज्ज्ञ शिफारस करतात की प्रौढांनी दररोज 2 ग्रामपेक्षा कमी सोडियम वापरावे म्हणजे अंदाजे एक चमचे सारखेच आहे. ही रक्कम केवळ अन्नातच नव्हे तर चिप्स किंवा जंक-फास्ट फूडसारख्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणार्या मिठाच्या प्रमाणाचा समावेश करते.
जास्त प्रमाणात मिठाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सर्वात सामान्य मानली जाते. हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका यामागे उच्च रक्तदाब हे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. अभ्यासाच्या पुनरावलोकनात, तज्ञांनी सांगितले आहे की मिठाचे सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात मोठ्या प्रमाणात मदत होते. विशेषत: अन्नामध्ये वरून मीठ घालणे अधिक हानिकारक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
काही अभ्यासकांनी असे सूचित केले आहे की, जास्त प्रमाणात मीठ सेवन केल्याने कोलन कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो. 2.68 लाखांहून अधिक सहभागींवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की जे व्यक्ती दररोज 3 ग्रॅम किंवा त्याहून अधिक मीठ खात आहेत त्यांना कोलन कर्करोगाचा धोका एक ग्रॅम किंवा त्याहून कमी खाल्लेल्या नागरिकांपेक्षा 68 टक्क्यांपेक्षा जास्त असू शकतो. कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे प्रमुख कारण मानले गेले आहे.
संशोधकांचे म्हणणे आहे की, मिठाच्या जास्त सेवनामुळे उच्च रक्तदाबापासून हृदयविकार आणि कर्करोगापर्यंतच्या आजारांचा धोका वाढतो, अकाली मृत्यूचा धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी हा एक घटक मानला जाऊ शकतो. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की, मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब वाढतो आणि रक्तवाहिन्या-धमन्या कडक होतात. या बदलांमुळे हृदयविकार आणि अकाली मृत्यूचा धोकाही वाढू शकतो.
Health Tips Salt Use Excess Intake Harmful Side Effects