पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंदा जून महिना कोरडा गेला तरी आता जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळा म्हटले की, या काळात वातावरण तथा हवामान बदलामुळे अनेक आजार बळावतात. पावसात भिजल्यानंतर सर्दी-पडसे, थंडी ताप आदींसारखे आजार होतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्य सांभाळणे आवश्यक असते.
उन्हाळ्यात कडक गर्मीमुळे हैराण झाल्यानंतर प्रत्येकजण पावसाची आतुरतेने वाट बघत असतो. अशातच पावसाच्या सरी बारसल्यावर सर्वांनाच दिलासा मिळतो. मात्र पावसाच्या आगमनानंतर अनेक आजारांचेही आगमन होते आणि संसर्गाचा धोका अधिक वाढतो. अशा परिस्थितीमध्ये या आजारांपासून स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ टाळणे योग्य ठरते.
पावसाळ्यात श्रावण महिन्यात आपण पूजा आणि उपासनेच्या धार्मिक कारणांमुळे मांसाहार करणे बंद करतो. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील या काळात मांसाहारापासून अंतर राखले पाहिजे. पावसाळ्यात मांसाहार का टाळावा याची काही वैज्ञानिक करणे सांगण्यात आली आहेत.
निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जास्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा. पावसाळ्यात तर मांसाहार शक्यतो टाळावा त्या ऐवजी
सोया फूड घ्यावे. सोया एक उत्तम सुपरफूड असून प्रोटीनच्या काही वनस्पती-आधारित स्त्रोतांपैकी एक आहे, ज्यात सर्व नऊ अमीनो अॅसिड आहेत आणि सर्व सोया-आधारित खाद्यपदार्थ व वनस्पती-आधारित संपूर्ण प्रथिनेचा स्रोत बनवतात. सोया पदार्थ हे दर्जेदार प्रथिनांचे समृद्ध स्रोत आहेत.
सर्व शाकाहारी, मांसाहारी आणि फ्लेक्सटेरियन व्यक्ती त्यांच्या रोजच्या आहारात सोया बीन्स, सोया शेंगदाणे, सोया भाग, सोया चॅप, सोया दूध, सोया पीठ, टोफू, टेंफ इत्यादी पदार्थांचा समावेश करू शकतात. सध्या मांसासारख्या बनावट पदार्थामुळे सोया मांसाहारी लोकांत लोकप्रिय होत आहे. मासे खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे, परंतु पावसाळ्यात ते टाळा. खरंतर अतिवृष्टीमुळे सर्व घाण तलावात, समुद्रात वाहून जाते. ही घाण मासे खातात, त्यामुळे ते प्रदूषित होतात. जर हे मासे खाल्ले तर तुम्ही आजारी पडू शकता.
त्याच प्रमाणे पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे आपल्या पचनशक्ती कमी होते. मांसाहारी पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. तसेच, पचनशक्ती कमकुवत असल्यास मांसाहारी अन्न आतड्यांमध्ये सडू लागते आणि या अन्नातून विषबाधा होण्याचा धोकाही असतो. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे हवेतील आर्द्रता वाढते, त्यानंतर बुरशीचा धोका आणि बुरशीजन्य संसर्गाचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात सूर्यप्रकाशाचा अभाव असल्याने अन्नपदार्थही अधिक वेगाने सडू लागतात. पावसाळ्यात कीटकांची संख्या लक्षणीय वाढते आणि त्यामुळे चिकनगुनिया आणि डेंग्यूचे डास वाढू लागतात, त्यामुळे जनावरेही आजारी पडतात, त्यामुळे या प्राण्यांचे मांस खाल्ल्याने शरीराला हानी पोहोचते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहार टाळावा.
Health Tips Monsoon Rainy Season Non Vegetarian food