पणजी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथे आज झालेल्या आर्यनमॅन स्पर्धेत नाशिकच्या अकरा खेळाडूंनी बाजी मारली. या स्पर्धेत महेंद्र छोरीया, डॉ. वैभव पाटील, प्रशांत डबरी, अरुण पालवे, डॉ. सुभाष पवार, दिपक भोसले, प्रदिप जाधव, अविनाश पाथरे, राहुल जगताप, रोहन भिंगे, सागर गायकवाड यांनी ही स्पर्धा निर्धारित वेळे अगोदर पूर्ण केली. त्यामुळे ही बाब नाशिककरांसाठी गौरवास्पद आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व खा. तेजस्वी सूर्या यांच्या हस्ते सकाळी ७ वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेसाठी संपूर्ण जगातून १ हजार ४०० खेळाडू सहभागी झाले होते. भारताच्या बाहेर होणाऱ्या स्पर्धांमध्ये काठिण्य पातळी कमी असते मात्र गोव्याच्या स्पर्धेत खळाडूंचा कस लागत होता. या स्पर्धेत खेळाडूंना प्रामुख्याने दमट हवामानाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला. समुद्रात पोहणे, सायकल चालवणे हे सर्वांत जास्त कठीण होते.
गोव्याच्या मिरामार बीचवर ही स्पर्धा सुरु झाली. थंड प्रदेशात स्पर्धा पूर्ण करणे सोपे असते मात्र दमट हवामानाच्या प्रदेशात लगेच थकवा जाणवतो अशा परिस्थितीत सगळ्यांना स्पर्धा पूर्ण करताना नाकीनऊ आले. २ किलोमिटर समुद्रात पोहणे, ९० किलोमिटर सायकलिंग, २१ किलोमिटर रनींग खेळाडूंना पूर्ण करावी लागली. शहरातील अकरा खेळाडूंनी अगोदर अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.
Goa Ironman Nashik 11 Players Success
Sports