India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

गायरान जमिनीवरील अतिक्रमण पडणार महागात ! राज्यभरात इतकी आहे बेकायदेशीर बांधकामे

India Darpan by India Darpan
February 28, 2023
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गायरान जमिनीवर अतिक्रमण करणे आता महागात पडणार आहे. कारण अतिक्रमण करणारे मालकी हक्क सिद्ध करू शकले नाही तर त्यांच्यावर तीस दिवसांच्या आत कारवाई करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे.

राज्यभरात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. या जमिनींवर बेकायदेशीर बांधकामांची यादीही मोठी आहे. यापूर्वीच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सरकारला जुलै २०११ पर्यंत नियमीत करण्यात आलेल्या बांधकामांची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने सादर केलेल्या माहितीनुसार गायरान जमिनींवर सध्या राज्यभरात २ लाख २२ हजार १५३ बेकायदेशीर बांधकामे आहेत. त्यातील ४.५२ हेक्टर जमिनीपैकी अतिक्रमित क्षेत्र १० हजार ८९ हेक्टर एवढं आहे. सरकारी मालकीच्या असलेल्या जमिनीच्या केवळ २.२३ टक्के एवढं हे प्रमाण असल्याची माहिती सुद्धा राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. अलीकडेच झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने नव्याने नोटीस बजावणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली आहे. जमिनीवरील हक्क सिद्ध करण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली जाईल. त्यात अपयशी ठरल्यास अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतरची कारवाई महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यानुसार होईल, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयात दिली.

अतिक्रमण करणारे कोणत्या योजनेसाठी पात्र?
राज्य सरकार अतिक्रमण हटविण्यासाठी कायद्यानुसार उपाययोजना केल्या जात असल्याचे न्यायालयात म्हणाले. त्यावर न्यायालयाने अतिक्रमण करणारे कोणत्या सरकारी योजनेसाठी पात्र आहेत, हे दाखवून देण्याचे निर्देश दिले आणि सुनावणी तहकूब केली. यापूर्वी गायरान जमिनींवरील अतिक्रमण हटविण्याबाबत सरकारचं काही धोरण आहे का, असा सवालही न्यायालयाने केला होता.

कारवाई तर होणारच
यासंदर्भात उच्च न्यायालयाने सुमोटो दाखल केलेली आहे. कारण गेल्यावर्षी दाखल झालेली एक याचिका न्यायालयाने फेटाळून लावत या अतिक्रमणाची गंभीर दखल घेतलेली आहे. राज्य सरकारने न्यायालयाला आपण कारवाई करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले आहे.


Previous Post

बारावी परिक्षा कॉपी प्रकरण: या शाळेतील नऊ शिक्षकांवर गुन्हे दाखल

Next Post

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही

Next Post

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर विधानसभेत ग्वाही

ताज्या बातम्या

हाय रे देवा… कांद्याला मिळाला २५ पैसे प्रतिकिलो भाव… शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू… दिवसेंदिवस परिस्थिती बिकट…

April 2, 2023

मालेगावात गजबजलेल्या ठिकाणावरुन दुचाकी चोरीला; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद (व्हिडिओ)

April 2, 2023

दंगलींमध्ये राज्य सरकारचाच सहभाग… आमचा मार्ग अडविण्यासाठीच दंगल… संजय राऊतांचा हल्लाबोल

April 2, 2023

बागेश्वर बाबांचे साईबाबांविषयी वादग्रस्त विधान… भाविकांमध्ये असंतोष… बघा काय म्हणाले ते…

April 2, 2023

सावधान! ठाण्यातील मुंब्रा बायपास बंद; नाशिकसह अन्य शहरांना जाणाऱ्या वाहतुकीला फटका… हे आहेत पर्यायी मार्ग

April 2, 2023

कर्मचारी कपातीनंतर गुगलने घेतला हा मोठा निर्णय; अन्य कंपन्याही घेणार?

April 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group