वाढत्या पर्यावरणीय चिंतेमुळे वृक्षारोपणाकडे अनेकांचा कल वळला आहे. मात्र, शास्त्रोक्त पद्धतीने वृक्षारोपण न केल्यामुळे रोपे जगत नसल्याचेही चित्र आहे. तसेच, रोपे जगली तरी त्यातून अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. रोप कोणते निवडावे, खड्डा केवढा असावा, कोठे वृक्षारोपण करावे आदींची शास्त्रोक्त माहिती देत आहेत ‘आपलं पर्यावरण’ संस्थेचे शेखर गायकवाड (मो. 9422267801). तसेच, पर्यावरणाच्या क्षेत्रातील आणि खासकरुन झाडांशी संबंधित अन्य प्रश्नांवरही ते प्रकाश टाकत आहेत. इंडिया दर्पणमध्ये दर आठवड्याला प्रसिद्ध होणाऱ्या या लेखमालेला वाचकांचा उदंड प्रतिसाद आहे. शेखर गायकवाड यांनी स्वकष्टाने आणि सामुहिक प्रयत्नातून देवराई निर्माण केली आहे. गेल्या तीन दशकांचा त्यांचा गाढा अनुभव आणि त्यांचे निरीक्षणातून मिळणारी माहिती जाणून घेण्यासाठी वाचक उत्सुक असतात. ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी’ या लेखमालेतील विविध लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे