त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ब्रह्मगिरीच्या डोंगर रांगांमध्ये उगम पावणारी गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. या नदीचे पावित्र्य इतके मोठे आहे की, दर १२ वर्षांनी याच नदीच्या किनारी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ऐतिहासिक कुंभमेळा संपन्न होतो. गेल्या काही दशकात या नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. हा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात आणि पुण्यामध्ये हरित लवादामध्येही गेला आहे. तरीही अद्याप गोदावरी निर्मळ झालेली नाही.
गोदावरीला तिचे पुनर्वैभव प्राप्त व्हावे यासाठी ‘नमामी गोदा फाऊंडेशन’चे अध्यक्ष राजेश पंडित (मो. ७३०४१२००७७) यांनी मोठा लढा सुरू केला आहे. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी विविध सरकारी कार्यालयांपासून न्यायालयापर्यंत पाठपुरावा केला आहे. त्यांच्या याच अनुभवाचे संचित असलेली नमामी गोदा ही लेखमाला सध्या ‘इंडिया दर्पण’मध्ये प्रसिद्ध होत आहे. गोदावरीचे विविध प्रश्न नेमके काय आहेत, ते कसे सोडवले जाऊ शकतात याचा उहापोह या लेखमालेत केला जात आहे. वाचकांचा त्यास मोठा प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळेच या लेखांची एकत्रित लिंक वाचकांकडून मागितली जात आहे. ती येथे उपलब्ध करुन देत आहोत.