इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या देशात लोकशाही असल्याने नेहमीच कोणत्या तरी निवडणुका होतच असतात. नुकत्याच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यावेळी सरपंच पदासाठी देखील थेट जनतेतून उमेदवार निवडून देण्यात आला. निवडणूक म्हटले की, जय पराजय होत असतो, त्यानंतर कोणत्याही विजयी उमेदवाराची मिरवणूक काढली जाते. त्यामुळे सरपंच पदाच्या विजयी उमेदवारांची देखील गावातून मिरवणूक काढण्यात आली. एका गावात चक्क सरपंच पदात पराभूत झालेल्या उमेदवाराची मिरवणूक काढण्यात येऊन त्याचा सत्कार करण्यात आला. इतक्याच नव्हे तर त्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम देखील देण्यात आली. याला कारण म्हणजे उमेदवार अत्यंत प्रामाणिकपणे गावाच्या विकास कार्यासाठी काम करत होता असे सांगण्यात येते.
यंदा सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराला सत्तेबरोबरच प्रसिद्धीही मिळते. मात्र त्याचबरोबर त्यांच्यावर जबाबदारीही पडते. मात्र दुसऱ्या बाजूला पराभूत झालेल्या उमेदवाराला निराशा येते. कारण या निवडणुकीमध्ये त्याचा वेळ आणि पैसा वाया गेलेला असतो. मात्र हरियाणामधील एका गावाने चक्क पराभूत व्यक्तीचा सत्कार केला आहे. विशेष म्हणजे सरपंचपदाची निवडणूक हरलेल्या व्यक्तीचा गावकऱ्यांनी सत्कार केला. सुभाष नांबरदार असे या उमेदवाराचे नाव आहे. गावातील मतदार गुप्त पद्धतीने ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड करतात आणि मग या सदस्यांतून सरपंचाची निवड केली जाते. मात्र आता नवीन पद्धतीने थेट जनतेतूनच सरपंच निवडला जातो.
हरियाणातील हिस्सारमधील बुधा खेरा गावात देखील सरपंचपदाची निवडणूक पार पडली सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या या पराभूत उमेदवाराचा गावकऱ्यांनी एकत्र येऊन सत्कार केला. निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतरही सत्कार झालेला हा या गावातील पहिलाच उमेदवार असल्याचे सांगण्यात येते. केवळ सत्कार नाही तर या गावकऱ्यांनी तब्बल ३१ लाख ३१ हजार रुपयांची रक्कमही या उमेदवाराला भेट म्हणून दिली आहे.
निवडणूक प्रचारादरम्यान या उमेदवाराने मांडलेले मुद्दे आणि एकंरितच त्याने गावासंदर्भात घेतलेल्या भूमिकाचा सन्मान करण्याच्या दृष्टीने हे सारं करण्यात आल्याचे गावकरी सांगतात. सुभाष नांबरदार याने गावामध्ये बंधुभाव आणि एकोपा वाढावा यासाठी खूप प्रयत्न केले. ते सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये सुखविंदर बाधू यांच्याविरोधात उभे होते. केवळ १५७ मतांनी ते पराभूत झाले. मात्र सुभाष यांच्या पराभवानंतरही गावकऱ्यांनी एकत्र येत एका विशेष कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला. योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन गावातील एकोपा वाढवण्यासाठी आणि गावाच्या भल्यासाठी सुभाष यांनी केलेल्या प्रयत्नांची जाण ठेऊन गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी गोळा गेलेला निधी यावेळी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
गावचे माजी सरपंच समशेर कारवासरा यांनी सांगितले की, सुभाष हे समाजासाठी काम करणारे व्यक्तीमत्व असल्याचे सांगितले. मागील अनेक वर्षांपासून ते समाजिक कामांमध्ये सक्रीयपणे सहभाग घेतात असेही समशेर यांनी सांगितले. तसेच त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि निवडणुकीत पराभूत झाले असले तरी ते आमचे हिरो आहेत. आम्ही त्यांना या पराभवाने खचून जाऊ नका, असे कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, असेही समशेर म्हणतात.
दरम्यान, या सत्कारामुळे सुभाष भारावून गेले असून त्यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. गावकऱ्यांनी माझ्याबद्दल दाखवल्याबद्दल प्रेमासाठी मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. मी विजयी उमेदवाशी कोणतेही मतभेद ठेवणार नाही, विशेष म्हणजे गावकऱ्यांनी दिलेल्या या पैशांमधून गावासाठीच काम करण्याचा विचार आहे. या पैशांमधून रस्ते ,पाणी या सोयी सुविधा तसेच तरुणांना खेळाचे साहित्य आणि पुस्तकांचा वाटप करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
Election Defeated Candidate Village Given 31 Lakh Gift
Haryana Hissar Sarpanch Grampanchayat