इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानने शुक्रवारी मध्यरात्री भारताच्या पाच राज्यांमधील २० शहरांना टार्गेट करत ड्रोन हल्ला केला. यात जम्मू, काश्मीर, राजस्थान, पंजाब आणि गुजरातचा राज्यातील शहरांचा समावेश आहे. हा हल्ला नागरी वस्त्या, धार्मिक स्थळे आणि विमानतळांवर करण्यात आला. पण, भारताने हे ड्रोन हल्ले हाणून पाडले. तर दुसरीकडे भारताने पाकिस्तानमधी सैन्य ठिकाणी हल्ले केले. त्यात नूर खान (रावलपिंडी), मुरीद (चकवाल), रफीफी (शोर्कोट), येथील एयरबेसचे मोठे नुकसान केले. सहा बैलिस्टिक मिसाईलने हे ह्ल्ले करण्यात आले. त्यामुळे पाकिस्तानने आपला एयरस्पेस बंद केला. इस्लामाबाद, लाहोर आणि इतर प्रमुख शहरातही धमाके झाले.
ड्रोन हल्ल्याबरोबरच पाकिस्तानने सीमा भागात सातत्याने गोळीबार सुरु केला. त्यालाही भारताने चोख प्रत्त्युत्तर दिले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये श्रीनगर विमानतळ, बडगाम, गांदरबल, अवंतीपोरा यांसारख्या काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या भागांना लक्ष्य केले.
पाकिस्तानने चार राज्यांमधील जम्मू, सांबा, उरी, पुंछ, पठाणकोट, बारामुल्ला, कुपवाडा, राजौरी, अवंतीपुरा, नौशेरा, अखनूर, तंगधार, जैसलमेर, उत्तरलाई, फलौदी, अमृतसर, फिरोजपूर, बाढमेर अशा २० शहरांना टार्गेट केले.