दिडोरी – केंद्रशासनाचा जास्तीत जास्त निधी आणून भरीव विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारतीपवार यांनी केले. जन आशिर्वाद यात्रा समारोप नंतर नाशिक येथे जाताना दिंडोरी येथे रविवारी रात्री डॉ. पवार यांनी भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. फटाक्यांच्या आतषबाजीत घोषणांच्या पावसाच्या साक्षीने फुलांच्या वर्षावात केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोदशेठ देशमुख,चंद्रकांत राजे, तालुकाध्यक्ष नरेंद्र जाधव, संघटन सरचिटणीस तुषार वाघमारे, शहराध्यक्ष शामराव मुरकुटे,युवामोर्चा तालुकाध्यक्ष अमर राजे,भास्करराव कराटे,नगरसेवक निलेश गायकवाड, सौ. सविताताई देशमुख, सौ. निर्मलाताई जाधव, सौ. रोहीणीताई पगारे, सौ.आशाताई कराटे,सौ. मंदाताई पारख, मंगलाताई शिंदे,फारूक बाबा,बाबुशेठ मणियार,संपतबाबा पिंगळ, विलासनाना देशमुख,सरपंच साजन गावीत,प्रल्हाद दळवी,चेतन व मित्रपरिवार, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष कैलास धात्रक,काकासाहेब वडजे, संजय कदम, रणजीत देशमुख,महेश कुलकर्णी, धीरज चव्हाण,राजू शिंदे,अनिल गाढे,बाळासाहेब सोनवणे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. क्रिशा फांऊंडेशन च्या संस्थापिका सौ.ऊज्वलाताई कोथळे-ऊगले यांनी औक्षण करत व विठ्ठल- रखुमाई च्या प्रतिकृती देऊन डॉ पवार यांचे स्वागत केले तसेच कोरोनामुळे आधारहीन झालेल्या महिलांच्या समस्या मांडल्या. यावेळी डॉ. भारतीताई पवार यांच्यातील संवेदनशील व हळवे नेतृत्व पहावयास मिळाले. तेंव्हा संध्या जोशी,ज्योती देवकर, नसरीन मणियार,ज्योती पाचोरकर व इतर महिला ऊपस्थिती होत्या.
याप्रसंगी डॉ. भारतीताई पवार यांनी श्रीमती बडगुजर, श्रीमती केंगे यांची आपुलकीने चौकशी केली त्यांचे सांत्वन करतांना ताई भावनिक झाल्या तसेच शासनस्तरावर अशा सर्व महिलांसाठी ऊपाययोजना करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच स्थानिक पातळीवर विविध केंद्रीय व राज्यस्तरीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमार्फत प्रयत्न करण्याचे सूचित केले. तसेच यावेळी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रशासनाचा जास्तीत जास्त निधी आणून भरीव विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. भाजपा ऊद्योग आघाडीचे तालुका अध्यक्ष महेश कुलकर्णी यांनी लहान ऊद्योजकांच्या समस्यांवर ऊपाययोजना करण्यासाठी डॉ. पवार यांना विनंती केली. त्याबाबतीत ही केंद्रशासन सकारात्मक विचार करेल असे आश्वासीत करण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी स्थानिक समस्या , अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, भाजीपाला विक्रेत्यांची होणारी परवड व पिळवणूक याकडे लक्ष वेधले याबाबत तातडीने कारवाई करण्याची विनंती पिडीतांनी केली. जन आशिर्वाद यात्रेचा समारोप करुन स्वगृही परततांना डॉ.भारतीताई पवार या समस्या जाणून घेऊन त्यांच्या कार्यतत्परतेसोबतच संवेदनशीलता व हळवेपणा यांचा सुरेख मिलाफ यांचा अनुभव देऊन असंख्य शुभेच्छा सोबत घेऊनच आपल्या स्वगृही दिड महिन्यांहून अधिक काळानंतर परततांना रक्षाबंधनासाठी वाट पाहणाऱ्या भावाला राखी बांधण्यासाठी नाशिकच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह यावेळी दिसून आला.