नाशिक – भारतीय संस्कृतीत अंतिम यात्रा व अंत्यसंस्काराचा विधी पुरुष करत असतात. पण, या प्रथेला फाटा देत आईच्या निधनानंतर त्यांच्या चार मुली खांदेकरी झाल्या. तर पाचव्या मुलीने अग्निडाग देत आपले कर्तव्य पार पाडले. देवळाली कॅम्प येथील द्रौपदा बाई निकम (वय ८५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्यानंतर त्यांच्या मुलीने सामाजिक परिर्तनाच्या या गोष्टी करत पारंपारिक पध्दतीला फाटा दिला.
द्रौपदा बाई यांच्या पश्चात दोन मुले व पाच मुली आहेत. दोन्ही मुले परगावी कामाला असल्याने अंतिम यात्रेत सहभागी होऊ शकले नाही. द्रौपदा बाई निकम गेल्या १८ वर्षांपासून मुली व जावई त्यांचे सोबत राहत होत्या. त्या आठ वर्ष मुलगी शोभा पवार हिचे सोबत , त्यानंतर मोनीता लोखंडे या देवळाली हायस्कूल मध्ये शिक्षिका असलेल्या मोनिता लोखंडे या मुलीने आठ वर्ष सांभाळ केला. याशिवाय दुसऱ्या मुली सुनीता पगारे व माया जाधव यांच्याकडे राहायच्या. काही मुली दूर शहरात असल्या तरी आपल्या परीने आईचा सांभाळ करावयाच्या. जावई सुनील तेलूरे, सुशील जाधव,विलास पवार, राजेंद्र पगारे, नुतन शाळेचे पर्यवेक्षक कृष्णा लोखंडे यांनी देखील या मातेचा सांभाळ केला. आईच्या निधनानंतर या मुलींनी आईच्या देहाला स्मशानभूमी पर्यंत अखेरचा खांदा दिला.