देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या डाळींबाच उत्पादन चांगले आले असून भाव सुध्दा चांगला मिळत असल्याने देवळा तालूक्यात डाळींब चोरीच्या घटना घडत आहे. त्यामुळे दिवसभर शेतात काम केल्यावर रात्रीचा जागता पहारा देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. त्यासाठी शेतक-यांनी शेतात उंच मचाण उभारले आहे. या मचानातून शेतकरी रात्रभर त्यात बसून पहारा आता देत आहे. सध्या डाळींबाला ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने चोरट्यांची नजर डाळींबाकडे वळल्याने रात्रीचा जागते रहोचा इशारा एकमेकांना द्यावा लागत आहे. डाळींबाचे आगार असलेल्या कसमादे परिसरातील डाळींब उत्पादकांना आता एकाच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.