इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– जागो ग्राहक जागो –
नाट्य प्रेक्षकांचे अधिकार
नाट्य गृहामधील ग्राहक प्रेक्षक आपले कसे नुकसान होते आणि आपण त्यावर काय करू शकता याविषयी अनेकांना माहिती नाही. नाटक वेळेवर सुरू झाले नाही तर ती सुद्धा प्रेक्षकांची फसवणूकच आहे. याशिवाय ग्राहकांचे नेमके अधिकार काय आहेत, याविषयी आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊ….
आजच एका सोशल मीडिया ग्रुप वर एका संतप्त प्रेक्षकाने एका ढिसाळ कार्यक्रम नियोजन बद्दल आपले मत व्यक्त केले ते असे होते.
कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन होते.
………या मीडिया ग्रुप मार्फत नाट्यसत्ताक रजनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. या रजनीची सुरुवात *……* या कार्यक्रमाने होणार होती आणि वेळ होती रात्री साडेनऊ वाजताची.
या कार्यक्रमाची जाहिरात करताना कार्यक्रम नऊ वाजता सुरू होईल असं सांगण्यात आलं म्हणून सदर प्रेक्षक ८.४५ वाजताच नाट्यगृहामध्ये पोहोचले कारण आयत्या वेळेला जाऊन तिकीट काढायचं होतं त्यात वेळ वाया जाऊ नये, कार्यक्रम नऊ वाजता सुरू झाला तर कार्यक्रम चुकू नये या चांगल्या उद्देशाने वेळेचे नियोजन हातात ठेवून नाट्यगृहावर पोहोचले. अर्थात नाटक किंवा नाट्यगृहात होणारे कार्यक्रम म्हणजे जास्त तिकीट दर. पुढील रागातील तिकीट घेतलं आणि प्रवेशद्वारापाशी गेल्यावर तिथल्या डोअर किपरने सांगितलं की कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे त्यामुळे प्रवेश दिला जाणार नाही, थोडा वेळ थांबावं लागेल.
सदर प्रेक्षक ग्राहक ठीक आहे म्हणून थांबले.
त्यानंतर सदर प्रेक्षकांना बाहेर उभे असताना असे कळले की आत प्रवेश मिळाल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात ही दुसऱ्याच एका कार्यक्रमाने होणार आहे.
वास्तविक कार्यक्रमाची जाहिरात केली होती त्यात सदर कार्यक्रमाचा अजिबात उल्लेख नव्हता. तरीही सदर प्रेक्षकाने आणि इतर प्रेक्षकांनी तिकीट काढलेच होते शिवाय लांबून कार्यक्रमास आले होते म्हणून गप्प गुमान बाहेर नाट्यगृहाचे बाहेर उभे राहिले.
त्यानंतर साधारण ९.२० वाजता नाट्यगृहात प्रवेश करणे साठी दारे उघडली गेली. नऊ पस्तीस पर्यंत नाट्यगृहाच्या बंद पडद्या व्यतिरिक्त काहीही दिसत नव्हते. त्यामुळे काही प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली तेव्हा कुठे पडदा उघडला गेला.
स्टेजवर काही तथाकथित मान्यवर बसलेले होते. निवेदकाने निवेदन सुरू केलं आणि अपेक्षेप्रमाणे स्टेजवरील सर्व मान्यवरांचे सत्कार झाले, प्रायोजकांच्या काही जाहिराती दाखवण्यात आल्या… हे सगळं होईपर्यंत दहा वाजून पाच मिनिटे झाली होती आणि प्रेक्षकांचा संयम सुटू लागला होता… कार्यक्रम आजच सुरू होणार का असा प्रश्न प्रेक्षकागृहातून आला आणि सत्कार चमत्कार आवरतं घ्यायला लागलं आयोजकांना…
सगळ्यांचे आभार प्रदर्शन झाल्यानंतर निवेदकाने अशी घोषणा केली की यानंतरचा स्टेजवरचा परफॉर्मन्स वीस मिनिटं चालणारा वेगळा असणार आहे आणि नंतर जाहिरात केल्याप्रमाणे कार्यक्रम होईल.
हे ऐकताच प्रेक्षकांना ते असह्य झालं आणि प्रेक्षकागृहातून सर्वांनी निषेध व्यक्त केला आणि सांगितलं की आम्ही जाहिरात केलेला कार्यक्रम बघायला इथे आलो आहोत. त्यासाठी वेळ, पैसा घालवला आहे. कार्यक्रमाची वेळ नऊची दिलेली असतानाही एवढा उशीर झाला आहे आणि आता तुम्ही आयत्या वेळेला आम्हाला सांगत आहात की कुठलातरी वेगळाच कार्यक्रम सुरू होणार आहे…. लोकांचा हा विरोध किंवा निषेध बघून आयोजकांना सदर वेगळा परफॉर्मन्सचा कार्यक्रम रद्द करून मुख्य कार्यक्रम सुरू केला.
माझ्या प्रेक्षक ग्राहक मित्रानो, आपणावर अशी वेळ आली की आपण गप्प बसू नका. कार्यक्रम स्थळी ओरडा आरडा करून त्यावेळेवर कार्यक्रम सुरू करणेची कृती योग्य आहे पण आपण सदर कार्यक्रम सादर करणाऱ्या संस्थेस, कंपनीस अद्दल घडवली पाहिजे. आपले काय काय नुकसान झाले ते आपण विचारही करत नाही. जरा पहा यात अजून काही समाविष्ट करता येईल का.
१) कार्यक्रमाची वेळ पाळण्यात आली नाही म्हणजेच आपल्या बहुमूल्य वेळेचा अपव्यय झाला.
२) आयोजकांनी प्रेक्षकांना गृहीत धरलं, त्यांच्या वेळेलाही गृहीत धरलं
३) आयत्यावेळी वेगळाच कार्यक्रमाची घोषणा करून तो कार्यक्रम प्रेक्षकांवर थोपवण्याचा प्रयत्न केला.
४) सत्कार समारंभ आयोजित करून प्रेक्षकांना सदर कार्यक्रम पाहणेस भाग पाडले.
५) कार्यक्रम उशिरा सुरू झाला आणि उशिरा संपला त्यामुळे सर्व प्रेक्षकांचा एक तास वाया गेला त्यामुळे झोपायला उशीर झाला
६)झोप उशिरा घेतली गेली त्यामुळे सकाळी उठण्यासाठी उशीर झाला त्यामुळे दुसरा दिवस पण खराब झाला.
७)आरोग्यावर परिणाम झाला. अँसिडीटी झाली, डोके दुखायला लागले इत्यादी.
८) मानसिक त्रास सहन करावा लागला.
९) उशिरा कार्यक्रम सुटल्यामुळे बस ऐवजी रिक्षाने घरी जावे लागले त्यामुळे जास्त पैसे भाडे खर्चास लागले.
१०) दुसऱ्या दिवशी कामावर परिणाम झाला.
तेव्हा प्रेक्षक ग्राहक हो आपण याचा कधी विचार केला आहे का?
सदर कार्यक्रम आयोजकांनी काही मंडळींना खुश करणे साठी त्यांचा सत्कार करून काही गोष्टी पदरात पडून घेतल्या असतील पण प्रेक्षक म्हणून आपले सर्वांचे मिळून किमान ४०० रे ५०० तास वाया घालवले आहेत. (प्रेक्षक संख्येवर अवलंबून आहे)
त्यासाठी नुकसान भरपाई मागितली पाहिजे. आपण एकत्र यासाठी आलो तर उत्तमच पण कोणी आले नाही तर एका व्यक्तीने पण यासाठी ग्राहक आयोगाचे दार ठोठावले तर इतर आयोजक आपल्या सर्व प्रेक्षकांना गृहीत धरणार नाहीत.
आता आपले झालेले नुकसान मिळण्यासाठी आपण सदर संस्थेस, कंपनीस, आयोजकांना एक नोटीस पाठवून द्या त्यात ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार आपण वरील सर्व कारणासाठी नुकसान भरपाई द्या असे लिहा. नोटीस रजिस्टर पोस्ट आणि ईमेल द्वारे पाठवा.
लक्षात ठेवा आपण तिकीट विकत घेतले आहे म्हणजे आपण प्रेक्षक ग्राहक आहात. आपण फुकट कार्यक्रम पहात नव्हता.
काही मदत लागली तर अवश्य संपर्क करा , अगदी मोफत मार्गदर्शन मिळेल.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत ६३४, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०.
वेबसाईट: www.abgpindia.com
मोफत मार्गदर्शन हेतू संपर्क करा: *दर सोमवार, बुधवार, शुक्रवार सायंकाळी ६ ते ७.३०*
विजय सागर 9422502315
श्री विलास लेले 9823132172
सौ अंजली देशमुख 9823135803
श्रीमती विजया वाघ 9075132920
श्री रवींद्र वाटवे 9422383785
श्रीमती राजश्री दीक्षित 9422318909
श्री रवींद्र सिन्हा, बाणेर 7774001188
श्री विश्वास चव्हाण,धानोरी 7769978484
श्री अरुण नायर,विश्रांतवाडी 9890652675
*ठाणे*- श्रीमती स्मिता जामदार 9819438286,
श्री दिपक सावंत 9833398012
*डोंबिवली* श्री राजेंद्र बंडगर 9975712153
,*नागपूर*, श्री विलास ठोसर 7757009977
*कोल्हापूर* ऍड.सुप्रिया दळवी, मो.7038887979
*सांगली* श्री.सर्जेराव सूर्यवंशी, मो.9763722243
*सातारा* श्री जयदीप ठुसे, 9767666346
*सोलापूर* श्री.शशिकांत हरिदास, मो.9423536395
*जळगांव* डॉ. अनिल देशमुख, मो.7588011327
*नगर* श्री. अतुल कुऱ्हाडे, मो.9420642021
*नाशिक* श्री. तुळशीराम सांळुके, मो. 9422259089
श्री. रविंद्र अमृतकर, मो. 8412995454
*धुळे* श्री. हरीश जाधव,मो. 7798439555
*नंदुरबार*श्रीम.वदंना तोरवणे, मो .9156972786
*औरंगाबाद, लातूर, परभणी आणि इतर मराठवाडा विभाग* श्री विलास मोरे, परभणी 8180052500
*कोकण विभाग* श्रीमती वेदा प्रभुदेसाई 9075674971
Cultural Drama Event Timing Consumer Rights by Vijay Sagar