अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा वावर असल्याने हे वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये येऊन पिकांची नासाडी करत असल्याने अक्षरशा शेतकऱ्यांना दिवसरात्र या पिकांना राखण राहून वन्यप्राणी हकलण्याची वेळ येत आहे. येवला तालुक्यात पावसाने उशीरा हजेरी लावल्याने शेतकऱ्याने पेरणी केली मात्र पीक उगण्यास सुरुवात होताच हरणांसह इतर वन्य प्राणी पिकांची नासाडी करत असल्याने पूर्व भागातील शेतकऱ्यांना आपल्या पिकांची दिवस रात्र राखण करण्याची वेळ आली आहे. राखणादारी करण्यासाठी शेतातच शेतकरी झोपडी करून राहत आहे. वनविभागाने वनहद्दीला तार कंपाउंड करावे जेणे करून येवला तालुक्यातील रेडाळे परिसरासह पूर्व भागात वनक्षेत्रा लगत असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी होणार नाही. पिकांची नासाडी करणाऱ्या हरणांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करीत आहे.