India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

मोदींना प्रश्न विचारुन राहुल गांधींनी हक्कभंग केला का? नोटीस का दिली? आता पुढे काय होणार?

India Darpan by India Darpan
February 15, 2023
in राष्ट्रीय
0

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत पंतप्रधान व अदानी यांच्यातील संबंधांवरून अनेक गंभीर आरोप केला होते. त्यावरून लोकसभा सचिवालयाने आता त्यांना हक्कभंगाची नोटीस पाठविली आहे. तुम्ही केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, अथवा माफी मागा, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधींनी अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले होते. राहुल गांधींचे हे आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना पुरावे सादर करण्यास सांगून देखील ते देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे यावेळी राहुल गांधींवर कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिला आहे. राहुल गांधींना लोकसभेचे सदस्यत्व गमवावे लागेल, असा दावा भाजपकडून केला जात आहे.

जोशी, दुबे यांची तक्रार
राहुल गांधी यांच्या भाषणानंतर प्रल्हाद जोशी व खासदार निशिकांत दुबे यांनी सचिवालयाकडे तक्रार दिली होती. राहुल गांधींनी हक्कभंग केला असून संसदेचा अवमान केला असल्याने त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, असे भाजपचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले. यात गांधी यांचे सदस्यत्वही रद्द होऊ शकते, असा दावा दुबे यांनी केला. दुसरीकडे लोकसभेत राहुल गांधी यांनी जाहीर माहितीच्या आधारे विधाने केली असल्याचा प्रतिवाद राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. दरम्यान, लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी, अपमानास्पद, असभ्य, असंसदीय आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गांधी यांना १५ फेब्रुवारीपर्यंत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी उपस्थित केलेले प्रश्न
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात आरोप करतानाचा अनेक प्रश्नही उपस्थित केले होते. गेल्या आठ वर्षांमध्ये अदानी समूहाची इतकी भरभराट कशी झाली? मोदी- अदानीत नाते काय? दोघेही परदेश दौऱ्यावर एकत्र किती वेळा गेले? मोदींचा दौरा झाल्यानंतर तात्काळ अदानींनी किती परदेश दौरे केले? अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले?, आदी प्रश्नांचा भडीमार करीत त्यांनी पंतप्रधनांवर निशाणा साधला होता.

Congress MP Rahul Gandhi Parliament Rule Violation Notice


Previous Post

राज्यातील ८४६ शाळांमध्ये राबविली जाणारी पीएम श्री योजना आहे तरी काय?

Next Post

अहमदनगर शहर व जिल्ह्यात आजपासून हे करता येणार नाही; असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next Post

अहमदनगर शहर व जिल्ह्यात आजपासून हे करता येणार नाही; असे आहेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group