इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय इतिहासात अनेक महान व्यक्तिमत्व होऊन गेलेत, त्यांचा नेहमी गौरव आणि उल्लेख होतो. तसेच त्यांच्या कार्य कर्तृत्वाचे आजही गुण गायले जातात, त्यांचे तत्व आजही मार्गदर्शक ठरणारे आहे त्यापैकीच एक म्हणजे आचार्य चाणक्य होत. ते एक महान विद्वान तर होतेच पण उत्तम शिक्षक देखील होते.
आर्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथे आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. ते एक कुशल मुत्सद्दी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात विचित्र परिस्थितींचा सामना केला होता परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांचे ध्येय साध्य केले.
एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात आचार्य चाणक्य यांच्या वचनांचे पालन केले तर तो जीवनात कधीही चूक करणार नाही आणि यशस्वी पदावर पोहोचू शकतो. आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार मानवाने आपले जीवन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी नेहमी सत्कर्म केले पाहिजे. जे चांगले आणि उत्कृष्ट कार्य करत नाहीत, त्यांना ना जीवनात यश मिळते आणि ना ते सुखी होऊ शकतात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले की, जीवनात शांती आणि आनंद आणण्यासाठी या काही कामांपासून दूर राहिले पाहिजे. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी , जाणून घेऊ या..
आळस
आचार्य चाणक्यानेही आपल्या धोरणात आळसापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. आळस माणसाची प्रतिभा नष्ट करतो. आळशीपणामुळे व्यक्तीला लाभाच्या संधीपासून वंचित राहावे लागते. आळशी माणूस नेहमी ध्येयापासून दूर राहतो. त्यामुळे त्यापासून दूर राहण्यातच सर्वांचे भले आहे.
अहंकार
आर्य चाणक्य यांच्या नीतीनुसार प्रत्येकाने अहंकारापासून दूर राहावे. अहंकार माणसातील सर्व काही नष्ट करू शकतो. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. असे लोक स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चूक करू लागतात. त्यामुळे लोक त्यांची बाजू सोडू लागतात आणि नंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.
राग
राग किंवा क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो माणसाला खाऊन टाकतो. चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीला राग येतो त्याला कधीच आदर मिळत नाही. इतर लोक रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहतात. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा असे लोक एकटे पडतात आणि दुःख सहन करतात.
ढोंगीपणा
आर्य चाणक्याच्या नीतिमत्तेनुसार, जो व्यक्ती (ढोंग) दाखवत राहतो, त्यांच्या जीवनात शांतता येत नाही. असे लोक नेहमी अशा स्पर्धेत व्यस्त असतात ज्याला अंत नाही आणि महत्त्व नाही. खोटेपणा आणि चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतण्याचे नाटक करणारी व्यक्ती. ज्याचा पुढे त्याला त्रास होतो.
Chanakya Neeti Happy Life Happiness Dos and Don’ts