इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एडटेक क्षेत्रातील दिग्गज बायजू मोठ्या प्रमाणावर बंद होणार आहे. कंपनी पुढील सहा महिन्यांत ५ टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. याअंतर्गत २५०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना आहे. कर्मचाऱ्यांच्या संख्येतील ही कपात तंत्रज्ञानासह अनेक विभागांमध्ये होणार आहे. बायजूमध्ये ५० हजारांहून अधिक कर्मचारी आहेत.
Byju’s च्या सह-संस्थापक दिव्या गोकुलनाथ यांच्या मते, कंपनी परदेशात ब्रँड स्थापन करण्यावर भर देईल. यासाठी भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण १० हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गोकुळनाथ म्हणाले की, आम्ही नफ्यासाठी एक मार्ग आखला आहे जो आम्ही मार्च २०२३ पर्यंत साध्य करण्याचा विचार करत आहोत.
संपूर्ण भारतात २०० हून अधिक सक्रिय केंद्रे असल्याचा कंपनीचा दावा आहे. या वर्षाच्या अखेरीस ते ५०० केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षात बायजूच्या तोट्याने विक्रमी पातळी गाठली आहे. गेल्या आर्थिक वर्षात ४५८८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता, जो एका वर्षापूर्वीच्या तुलनेत १९ पट अधिक होता. त्याचबरोबर महसुलातही घट झाली आहे. त्यामुळेच कंपनीने आता आणखी कर्मचाऱ्यांना काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Byjus Big Decision Sack Up Employees
Education Business