नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन म्हणजेच पाच लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था होईल, गेल्या आठ वर्षांत, भारताने ब्रिटनला मागे टाकून ११ व्या क्रमांकावरून उडी घेत जगातली ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा पराक्रम केला आहे. मॉर्गन स्टॅन्लेने नुकत्याच केलेल्या अभ्यासातही असे भाकीत केले आहे की २०२७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसरे स्थान मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.
तामिळनाडूत इंडिया सिमेंट्सच्या अमृत महोत्सवी सोहळ्याला ते उपस्थित होते. पुढे ते म्हणाले की, राजकीय स्थैर्य आणि पारदर्शक कारभारामुळे भारत आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. भारताची ही कामगिरी आज संपूर्ण जगाने मान्य केली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचे वर्णन, आर्थिक निराशेच्या अंधारातला एक तेजोमय प्रकाश किरण असे केले असल्याचेही अमित शहा यांनी नमूद केले. IMF च्या अंदाजानुसार २०२२-२३ म्हणजेच विद्यमान आर्थिक वर्षात स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातल्या (GDP) ६.८ टक्के वाढीसह भारत G-20 राष्ट्र समुहात दुसऱ्या क्रमांकावर असेल, असेही त्यांनी सांगितले. तर २०२३-२४ मध्ये भारत जीडीपीतल्या ६.१ टक्के वाढीसह, G-20 समुहात पहिल्या क्रमांकावर असेल, असा अंदाजही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केल्याचे अमित शहा म्हणाले.
Indian Economy Amit Shah