India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सलमान खान आणि अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढविली; शिंदे सरकारचा निर्णय

India Darpan by India Darpan
November 1, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील शिंदे सरकारने सेलिब्रेटींच्या सुरक्षेबाबतत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अभिनेता सलमान खान आणि गायिका अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमृता या पत्नी आहेत.

लॉरेन्स बिश्नोई टोळीने बॉलीवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर राज्य सरकारने त्याच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने अभिनेता सलमान खानला मुंबई पोलीस Y+ श्रेणीचे सुरक्षा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. बिश्नोई टोळीने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात आहे. या वर्षी मे महिन्यात पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची हत्या केल्याचा आरोप बिश्नोई टोळीवर आहे.

एखाद्या व्यक्तीला सुरक्षाकवच प्रदान करण्याबाबत राज्य गुप्तचर विभागाचा अहवाल महत्त्वाचा असतो. संबंधित व्यक्तीच्या जीवाला किती धोका आहे याचा विचार करुन राज्य सरकार सुरक्षेचा निर्णय घेते. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सलमान खान आणि अमृता फडणवीस यांना आता चार शस्त्रधारी सुरक्षारक्षक मिळतील. २४ तास ते या दोघांना सुरक्षा देतील.

लॉरेन्स बिश्नोई याने काही वर्षांपूर्वी जोधपूर येथील न्यायालयात सुनावणीदरम्यान सलमान खानला धमकी दिली होती. सलमान खानने काळवीटाची शिकार करून बिश्नोईंच्या भावना दुखावल्याचं त्यांनी म्हटले होते. बिष्णोई समाज काळ्या हरणाची पूजा करतो आणि सलमान खानने त्याला मारून बिश्नोईंना भडकवले असे त्याचे म्हणणे आहे.

अलीकडेच सलमान खानच्या कुटुंबाला कागदी स्लिपच्या रूपाने धमकी मिळाली होती. सलमान खानचे वडील, लेखक सलीम खान त्यांच्या नियमित मॉर्निंग वॉकनंतर बसले होते त्याच बाकावर कोणीतरी धमकीची स्लिप टाकली होती. या धमकीनंतर सलमानला मुंबई पोलिसांनी सुरक्षा पुरवली होती. परंतु, आता राज्य सरकारने सलमानसा Y+ सुरक्षा कवच प्रदान केले आहे.

तसेच, सलमान खान व्यतिरिक्त अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अक्षयला एक्स प्रोटेक्शन देण्यात आले असून यामागचे कारण त्याच्या कॅनेडियन नागरिकत्वाबाबत सोशल मीडियाचा द्वेष आणि धमक्या हे सांगितले जात आहे. विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ रिलीज झाल्यापासून अनुपम खेर यांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे त्यांचीही सुरक्षा वाढविली आहे.

Bollywood Actor Salman Khan Security Enhance


Previous Post

गोव्यात पार्टीचे नियोजन करताय? आधी हे वाचा, मग ठरवा

Next Post

नाशिक सिटी बससेवेचे अनोखे गिफ्ट; आता शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवास

Next Post
संग्रहित फोटो

नाशिक सिटी बससेवेचे अनोखे गिफ्ट; आता शहराबाहेरील विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवास

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group