इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करीत आहे. ताजे वृत्त हाती आले तेव्हा भारताने ६ षटकात २ बाद, ६२ धावा झाल्या आहेत. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे दोन्ही सलामीवीर प्रत्येकी २८ धावा काढून बाद झाले आहेत. आता मैदानावर सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली आहेत.
पाकिस्तान संघात एक बदल करण्यात आला आहे. शाहनवाज दहानीच्या जागी मोहम्मद हसनैनला स्थान मिळाले आहे. भारताने तीन बदल केले आहेत. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या सामन्याचा भाग नाही आणि आवेश खान आजारी आहे. या सामन्यात दिनेश कार्तिकही खेळत नाहीये. त्याच्या जागी दीपक हुड्डाला स्थान देण्यात आले आहे, तर जडेजाच्या जागी रवी बिश्नोई आणि हार्दिक पांड्याचे पुनरागमन झाले आहे. याआधी दोन्ही संघांमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सामना झाला होता, जो भारताने 5 विकेट्सने जिंकला होता. अशा स्थितीत या दोन देशांमधील ही महान लढत रंजक ठरणार आहे.
Asia Cup 2022 IND vs PAK Match Started