नामदार छगन भुजबळ…..
सियासती सच की भी इम्तिहान …..
“ आज कल सियासती सच की भी इम्तिहान
होती है
ज़िंदगी तेरे हर इम्तिहान में अव्वल आना जुनून है मेरा “
असंच काही आयुष्य नामदार भुजबळ साहेबांचे, संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला, ईडी सीबीआय सारख्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय आयुष्य उध्वस्त करतानाच वैयक्तिक द्वेषाचे केंद्र सरकारच्या राजकारणामुळे राजकीय व्यक्तींनी त्यांच्या सावली पासून सुद्धा सावध राहिलं पाहिजे अशीच सध्या राजकीय क्षेत्रातील अनेकांची अवस्था, त्यातील विविध राजकीय घटनांचा जर विचार केला तर हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही, आज महाराष्ट्र सदन बांधकामा संदर्भात नामदार भुजबळ साहेबांना दोषमुक्त करताना न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आपण सर्वांनी स्वागत केले पाहिजे, परंतु याद्वारे भुजबळ साहेब फीनिक्स पक्षाचं दुसरं नाव आहे असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही
गेल्या पंधरा वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्याच्या विकासाचा विचार केला तर हरसूल पासून येवला, मुंबई पासून नाशिक यासारख्या तीन-चार पदरी रस्त्यांचे आधुनिक जाळे, चांदवड, मनमाडपर्यंत व्हाया पुनेगाव, 11.5 किमीचा बोगद्याद्वारे मांजरपाडा प्रकल्पाद्वारे दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या जीवनात केलेली क्रांती, नाशिक शहरातील फ्लाय ओव्हर, नाशिक विमानतळ उभारणी , ग्रीन जीम संकल्पना, वणी येथील नवतंत्रज्ञानयुक्त फर्नीक्यूलर ट्रॉली सेवा, ज्या महाराष्ट्र सदनामुळे माध्यमांनी जाणीवपूर्वक बदनामी केली त्या सदनाच्या भव्यदिव्य व अत्याधुनिक सोयींनीयुक्त महाराष्ट्र सदन ज्यांनी बघितले असेल त्यांना भुजबळ साहेबांच्या वैश्विक दूरदृष्टीची कल्पना येऊ शकते. कारण त्या सदनामुळे तमाम भारतीवासीयांना महाराष्ट्र राज्याची नवीन सांस्कृतिक ओळख झाली हे तितकेच खरे.
महाराष्ट्राच्या नकाशात येवला पैठणी हबमुळे असो किंवा इतर अनेक लोकहिताची कामे असो त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय कुणालाच घेता येणार नाही आणि असलेले कोणी हिरावून घेतो म्हटले तरी घेऊ शकत नाही. कारण मधल्या प्रतिकुल काळात त्यांनी जे भोगलं त्याने जीवनातील असहाय्यता, दु:खाच्या व एकाकीपणाच्या सर्व सिमा पुसल्या गेल्या आहेत. आज भुजबळ साहेबांची फिनिक्स पक्षाप्रमाणे एक नवी ओळख जिल्ह्याला होत आहे. बहुजन समाजाचा कळवळा असलेला पवार साहेबांनंतरचा एकमेव धडाडीचा नेता आजमितीस महाराष्ट्रात ऐवज म्हणून आहे. नाशिक जिल्हावासीयांच्यादृष्टीने अभिमानास्पद आहे. शेवटी वडिलकीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना नेहमीच सामाजिक सौदार्हाची भूमिका निभवावी लागते ती ते इमाने इतबारे निभवत आहेत त्यासाठी संवाद महत्त्वाचा, सर्वांचाच एकमेकांशी….महाराष्ट्राच्या राजकारणात जबाबदारीने काम करणारा एक बहुजन समाजाचा नेता मग ते महाराष्ट्राच्या राजकारणात विविध खात्याचे मंत्री असो किंवा विकासाची विविध क्षेत्रे पादाक्रांत करणार्या नाशिकचे पालकमंत्री म्हणून असो या माणसाच्या विविध विषयाच्या आकलनाच्या सीमा अमर्याद आहे हे या काळात स्पष्टपणे जाणवते. वयाच्या पंच्याहत्तरीकडे वाटचाल करत असताना घेतलेले दमदार निर्णय अत्यंत पारदर्शीपणे तर कधी कधी प्रशासनाला जाब विचारण्याची धमक किंवा निर्णय घेताना लोकांच्या हिताकरीता, लोकांच्या इच्छेला मान देऊन घ्यावयाचे त्यांचे तंत्र प्रत्येक नवीन राजकीय नेत्यांनी आत्मसात करावे असे आहे. निर्णय महत्वाचे की लोक, त्या प्रत्येकवेळी भुजबळ साहेबांनी लोकांचा विचार केला याची प्रचिती कोविड लॅब उभारणी असो, व इतर सर्व सामान्य जनतेच्या आरोग्याशी संबंधित समस्या सोडवण्याचे काम असो किंवा इतर खरंतर कोरोना संसर्ग काळात लोकांच्या जीवनातील दैन्य दूर करणे व पोटाची खळगी भरण्याचे काम महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून त्यांच्या वाट्याला आले असे नशीब लाभणे भाग्याचेच लक्षण. महाराष्ट्राच्या जनतेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच जणू…
व्यवस्थेतील सामाजिक जाण असलेला योद्धा (social warrior) म्हणून संबोधण्यात येईल हे मात्र निश्चित. राजकीय हेतूने निर्माण केलेल्या आरोपांच्या सर्व तोफा न्यायालयाच्या माध्यमातून आज भुजबळ साहेबांनी नेस्तनाबूत केल्या कारण सत्य हे त्यांच्या समवेत होते त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रातील संघर्षानेच त्यांना नवसंजीवनी दिली. जणू काही –
हर कदम पे शिकस्त ने यूँ हौसला दिया
जिस तरह कदम-ब-कदम पे कोई हमसफर चले
(शिकस्त – पराभवातून शिकणे)
– प्रा. डॉ. अशोक पांडुरंग पिंगळे
माजी संचालक, मराठा विद्याप्रसारक समाज