इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या ठिकाणी लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या रडार स्टिस्टिम उदध्वस्त केल्याची माहिती भारताच्या संरक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानमधील लाहोरमधील अमेरिकन नागरिकांसाठी हाय अलर्टचे निर्देश दिले आहे. भारत -पाकिस्तानच्या सीमाभागात जाऊ नका असेही सांगण्यात आले. पाकिस्तान सोडण्याच्या दिल्या सूचना देण्यात आल्या आहे.
अमेरिकेच्या लाहोरस्थित वाणिज्यदूतावासातील अधिकारी, कर्मचा-यांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेने त्यांच्या पाकिस्तानमधील नागरिकांना दिलेल्या या सूचनानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युध्द अटळ असल्याची चर्चा सुरु झाली आहे.