नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ झाल्यानंतर इतर अनेक देशांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढ होत आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये परदेशातून कोरोनाचे (COVID-19 India) नवीन रुग्ण आल्यानंतर सर्वजण सतर्क झाले आहेत. केंद्रासह अनेक राज्य सरकारांनी याबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून अनेक निर्बंधही लादण्यात आले आहेत. त्यातच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत आहे.
शेजारील देश चीन, जपान आणि अमेरिकेत वाढत्या कोरोनाचे रुग्ण पाहता भारतही सावध झाला आहे. केंद्र सरकारनेही कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. उत्तर प्रदेशातील आग्रा येथे चीनमधून परतलेल्या तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. युवक ७ दिवस वेगळे राहीपर्यंत आरोग्य विभाग त्याच्यावर देखरेख ठेवेल. दरम्यान, तरुणाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी लखनऊ येथील केजीएमयूमध्ये पाठवले जाणार आहेत. म्यानमारमधून राजधानी दिल्लीत परतलेले चार तर दुबई आणि म्यानमारमधून कोलकात्यात आलेले २ नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत.
बिहारच्या बोधगयामध्ये यूके आणि म्यानमारमधील परदेशी नागरिकही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याच वेळी, राज्य सरकारने आता बोधगयाला आलेल्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राने विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक फ्लाइटमधून २ टक्के लोकांची चाचणी घेतली जात आहे.
यासह, केंद्राने कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेल्या देशांतील सर्व प्रवाशांसाठी RTPCR चाचणी अनिवार्य केली आहे. हे देश म्हणजे चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, बँकॉक हे आहेत.
देशातील वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारने मास्क घालणे अनिवार्य केले आहे. उत्तर प्रदेशमध्येही पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या संदर्भात लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो. उत्तराखंड सरकारनेही मास्क घालणे अनिवार्य केले आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक, मुंबई आणि दिल्लीच्या एम्समध्येही मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. कर्नाटकातील चित्रपटगृहे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आले आहेत. पब, रेस्टॉरंट आणि बारमध्ये नवीन वर्ष साजरे करण्यासाठी देखील मास्क अनिवार्य असेल. तसेच, रात्री १ वाजेनंतर नवीन वर्ष साजरे करण्यास परवानगी नाही.
Alert India Covid Patients Foreign Passengers
Corona Virus