नाशिक – तालुक्यातील ओतुर येथील तलाठी जयवंत केदु कांबळे यांनी २५ हजाराची लाच मागितल्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदाराने कुंडाणे मधील ओतुर शिवारातील शेतजमीन विकत घेवून खरेदी केली. त्यानंतर सदर शेतजमिनीचे नाव सातबा-यावर नोंद करण्यासाठी तो तलाठी कार्यालयात गेला. येथे तलाठी कांबळे यांनी ३० हजाराची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. या सापळ्यात १८ ऑगस्ट रोजी ओतुर येथे तलाठी कांबळे यांनी ३० हजाराच्या लाचेची मागणी करुन तडजोडी अंतर २५ हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज तलाठी कांबळे विरुध्द कळवण तालुका पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आला.